Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परभणी : मोकाट डुकरं पकडायला गेले आणि गावकऱ्यांनी तिघांना चोर समजून मारलं, एकाचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 31 मे 2023 (23:13 IST)
परभणीत चोर समजून तीन जणांना गावकऱ्यांनी मारहाण केली. यात एका अल्पवयीन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यातील उखळद इथं ही घटना घडली. अरुणसिंग टाक, किरपालसिंग भोंड आणि गोरासिंग दुधानी या तिघा जणांना परभणीच्या उखळद गावानजिक जमावानं मारहाण केली. या घटनेत मारहाण झालेल्या इतर दोघा जणांवर परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
किरपालसिंग भोंड असं मृत्युमुखी पडलेल्याचे नाव असून, तो बलसा खुर्द येथील रहिवाशी होता.

जखमीनं पोलीस तक्रारीत काय सांगितलं?
यातील गोरासिंग दुधानी यानं पोलिसांना हकीकत सांगून तक्रार नोंदवली.
 
गोरासिंग दुधानी यानं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अरुणसिंग, किरपालसिंग आणि स्वत: गोरासिंग हे तिघेही दुचाकीवरून पिंपरी देशमुख गावात मोकाट सोडलेली डुकरं पकडण्यासाठी गेले होते.
 
डुकरं न सापडल्यानं हे तिघेही उखळद गावातील रस्त्यानं परभणीच्या दिशेने निघाले होते. 27 मे रोजीची पहाटेची 3 वाजण्याची वेळ होती.
 
हे तिघेही दुचाकीवरून उखळद गावाच्या वळणावरील ईदगाहजवळ पोहोचले असता, समोरून पाच अनोळखी लोक आले आणि त्यांनी त्यांची दुचाकी रोखली.
 
अरुणसिंग टाक ही दुचाकी चालवत होता. गोरासिंग दुचाकीवर मधे, तर किरपालसिंग मागे बसला होता.
 
अनोळखी लोकांनी या तिघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली.
 
गोरासिंग सांगतो की, “त्यांनी आम्हाला ‘चोर चोर’ म्हणत लोखंडी रॉडनं हात, पाय, पाठ, डोक्यावर मारण्यास सुरुवात केली. आमच्या डोळ्यात चटणीही टाकली.”
 
किरपालसिंगच्या डोक्यात रॉडनं मार लागल्यानं तो बेशुद्ध पडला.
 
त्यानंतर अरुणसिंग आणि गोरासिंग यांना आरडाओरड केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले.
 
त्यांनी पोलिसांना फोन करून बोलावलं. त्यानंतर तिघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं किरपालसिंगला मृत घोषित करण्यात आलं.
 
एफआयर दाखल
दरम्यान, ताडकलास पोलिसांनी फिर्यादी गोरासिंगच्या तक्रारीवरून सेक्शन 154 अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे.
 
भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 307, 341, 143, 148, 149 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
गोरासिंग यानं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत अक्रम पटेल असं आरोपीचं नाव सांगितलं असून, आणखी पाच जणांनी मारहाण केल्याचं म्हटलंय. मात्र, या इतर पाच जणांची नावं माहिती नसल्याचं सांगितलंय.
 
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंध कमिटीनं केला निषेध
दरम्यान, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने (SGPC) या घटनेचा निषेध केला असून, आरोपींना अटक करून कठोर शिक्षेची मागणी केलीय.
 
SGPC चे अध्यक्ष हरजिंदर सिंग धामी यांनी म्हटलं की, “हा गुन्हा मानवतेला लागलेला कलंक आहे. दोषी कठोर शिक्षेस पात्र आहेत. पोलिसांनी सर्व दोषींना अटक केली पाहिजे आणि कठोरातली कठोर शिक्षा दिली पाहिजे.”
 
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना परभणीच्या पोलीस अधीक्षक आर. रागसुधा म्हणाल्या, “ या प्रकरणात एकूण नऊ आरोपी आहेत. काही विशिष्ट समाजाच्या लोकांनाच अटक केली आहे या अफवेवर विश्वास ठेवू नका असंही त्या पुढे म्हणाल्या. गाववाल्यांनी संशयित चोर म्हणून पीडितांना मारहाण केली."
 
Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments