Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

२०० हून जास्त मुलांना विषबाधा, एकाचा मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018 (15:46 IST)
मुंबईतल्या गोवंडीतील महापालिकेच्या संजय नगर इथल्या मनपा शाळेत २००हून जास्त मुलांना विषबाधा झाली आहे. उर्दू माध्यमातील शाळेत दिल्या जाणाऱ्या औषधामुळे या मुलांना विषबाधा झाली आहे. या घटनेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून चांदनी साहिल शेख असं या दुर्दैवी मुलीचं नाव आहे. जवळपास १७३ विषबाधित विद्यार्थ्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर, ५५ विद्यार्थी शताब्दी रुग्णालयात दाखल आहेत. यापैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. 
 
महापालिकेच्या या शाळेत दिल्या गेलेल्या लोहाच्या गोळ्यांतून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सोमवारी शाळेत विद्यार्थ्यांना लोहाच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर या मुलांना मळमळ आणि उलट्या झाल्या. काही मुलांना तर रक्ताच्या उलट्या होवू लागल्यानं त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, आता पोलिस हवालदारांनाही गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार

२४ मे रोजी, १४ किमी/सेकंद वेगाने एक अंतराळ राक्षस येत आहे, नासाने म्हटले आहे - सतर्क रहा

पंतप्रधान मोदी, जेपी नड्डा यांनी माफी मागावी, भाजप नेत्यांच्या टीकेवर हर्षवर्धन सपकाळ संतापले

इंडोनेशियातील पापुआमध्ये सुरक्षा दल आणि बंडखोरांमध्ये चकमक, 20 हून अधिक जण ठार

LIVE: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, आता पोलिस हवालदारांनाही गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार

पुढील लेख
Show comments