Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पोलिसांनी जुगाऱ्यांकडून जप्त केला इतक्या लाख रुपयांचा मुद्देमाल !

Webdunia
गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (08:28 IST)
एखाद्या जुगार अड्ड्यावर छापा मारल्यावर जास्तीत जास्त किती रुपयांचा मुद्देमाल आढळून येऊ शकतो याचा तुम्ही कधी विचार केलाय का ?
नाशिक शहर पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत २७ जुगाऱ्यांवर कारवाई करत तब्बल ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नाशिक शहरातील उपनगर भागात पोलिसांना जुगार अड्डा सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
पोलिसांनी एक टीम तयार केली आणि या ठिकाणी रेड केली. यावेळी एकूण २७ जुगारी मिळून आले आणि जवळपास ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलं आहे. शहरात दिवसेंदिवस गुन्ह्गारी वाढतांना दिसून येतय. यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी पोलिसांना अधिकाऱ्यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
नाशिक शहरात अवैध जुगार, रोलेट, मटका खेळणारे अड्डे बिनधास्तपणे सुरू असल्याचे दिसून येते. यावर बऱ्याच वेळेला कारवाई केली जाते मात्र काही दिवसानंतर हे अड्डे पुन्हा सुरु झालेले असतात. अशा ठिकाणी समाजकंटकांची मोठी गर्दी दिसून येते. अशाच एका अद्द्याची माहिती उपनगर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता हा अड्डा एका बंदिस्थ फ्लॅट सुरु होता.
 
हा बंदिस्थ फ्लॅट नाशिकरोड जेल रोड भागातील कैलाशजी हौसिंग सोसायटी मधील आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एकूण २७ जुगाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून तब्बल ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलं आहे. सदर कारवाई बाबत उपनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
निवासी इमारतीमध्ये कुठलेही अवैध धंदे करू नये असे आदेश असताना सुद्धा, कैलाशजी सोसायटीत जुगार अड्डा सुरु असल्याचे आढळून आले. त्यामुळे सदर फ्लॅटचा भोगवटा रद्द होण्याबाबत तसेच पाणी आणि वीज कनेक्शन बंद करण्यासाठी संबधित विभागाशी पत्र व्यवहार केला जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
 
शहरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दिवसाढवळ्या महिलांची सोनसाखळी चोरी जाणे, मोटार सायकल चोरी होणे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर अवैध धंदे बिनदिक्कत सुरु असल्याचं यातून समोर आलंय. याचा काय बोध घ्यावा अशी चर्चा सध्या नाशिककर करत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना झाला प्राणघातक 'प्रोस्टेट कॅन्सर'

हवामान विभागाने देशातील १४ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा दिला

पालघर मध्ये केमिकल कारखान्यात गॅस गळती, १० कामगारांची प्रकृती खालावली

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments