Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रताप सरनाईक यांनी ईडीकडे एक आठवड्याची मुदत मागितली

Webdunia
गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (11:09 IST)
सुरक्षा रक्षक सेवा पुरविणार्‍या टॉप सिक्युरिटी कंपनीत विदेशी निधीचा गैरवापर झाल्याच्या शक्यतेतून तपास करत असलेल्या सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) हजर राहण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते व आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या पुत्रांनी एक आठवड्याची मुदत मागितली आहे. कोव्हीडच्या निर्बंध आणि नियमांचा आधार घेत सरनाईक यांनी ईडीकडे ही मागणी केली आहे.
 
टॉप सिक्युरिटी या कंपनीचे मुख्यालय अंधेरी येथे आहे. मुंबई आणि राज्यासह देशात विविध ठिकाणी सुरक्षा रक्षक पुरवले जातात. सरनाईक कुटुंबाचे या कंपनीच्या प्रवर्तकांशी आर्थिक संबंध आहेत. कंपनीच्या ब्रिटनमध्ये असलेल्या प्रवर्तकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम मुंबईत धाडण्यात आली व त्याचा गैरवापर झाला असा ईडीला संशय आहे. याच अंतर्गत मंगळवारी प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांच्या मुलांच्या घर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला आहे. सरनाईक यांचा पुत्र विहंग याची ईडीने तब्बल सात तास कसून चौकशी केली.
 
कारवाईची माहिती मिळताच प्रताप सरनाईक यांनी घर गाठले. कोव्हीडचा आधार घेत सरनाईक यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे. त्यानंतर प्रताप सरनाईक यांच्या मेहुण्याने ईडीला पत्र दिले आहे. सरनाईक हे बाहेरून आल्याने ते नियमानुसार क्वारंटाईन झाले आहेत. सोबतच पुत्र पूर्वेश यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर, पुत्र विहंग आणि त्यांची पत्नी अतितणावाने रुग्णालयात भरती झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

ठाणे: फोन वापरावरून झालेल्या वादातून तरुणीने ११ व्या मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या

LIVE: मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना अल्टिमेटम दिला

महाराष्ट्रातील औरंगजेब आणि इतर आक्रमकांच्या कबरी हटवणे हे मुख्यमंत्रीचें पहिले कर्तव्य-द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य

मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषण करणार; मागण्या पूर्ण करण्याची शेवटची तारीख दिली ६ जून

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारच्या प्रत्येक निर्णयाला संघाचा पाठिंबा, मोहन भागवत पंतप्रधान मोदींना भेटले

पुढील लेख
Show comments