Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Webdunia
शुक्रवार, 24 मे 2024 (18:20 IST)
पुण्यात 17 वर्षांचा मुलगा दारू पिऊन गाडी चालवत होता. भरधाव वेगात असलेल्या कारचा अपघात झाला, त्यात दोन जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात, न्यायाधीशांनी आरोपीला वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याची आणि रस्ता सुरक्षेवर निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली. जेव्हा या प्रकरणाला वेग आला तेव्हा अल्पवयीन मुलाचे वडील (विशाल अग्रवाल) आणि या प्रकरणाशी संबंधित इतर लोकांवर कारवाई केली गेली .
 
पुणे अपघात प्रकरणी न्यायालयाने मुख्य आरोपी विशाल अग्रवाल याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याशिवाय अन्य 5 आरोपींनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सर्व आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर न्यायालयाने सर्वांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. 
 
अल्पवयीन आरोपी ची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात शुक्रवारी 24 मे रोजी पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. 
आरोपीच्या जामीन आणि कोठडीबाबत सरकारी वकील आणि बचाव पक्षाने आपापले युक्तिवाद मांडले आणि अखेर न्यायालयाने निर्णय दिला.सरकारी वकिलाने सांगितले की, पोलिस अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत, ज्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांशी छेडछाड आणि दारू आणि अंमली पदार्थांचे सेवन यांचा समावेश आहे.पोलीस मोबाईलचा डाटा जप्त करून तपास करत आहेत. 

याशिवाय घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर मिळाला असून, त्यात छेडछाड करण्यात आली आहे. वाहनाची नोंदणी झालेली नाही.सरकारी वकिलाने न्यायालयात सांगितले की, घरात बसवलेल्या सीसीटीव्ही डीव्हीआरमध्ये छेडछाड करण्यात आली आहे.अल्पवयीन आरोपीचे त्याच्यासोबत अनेक मित्र होते, त्यांनी दारू व्यतिरिक्त इतर काही अमली पदार्थांचे सेवन केले होते का, याचाही तपास होण्याची गरज आहे
 
बचाव पक्षाच्या वकिलांनी या खटल्यातील सरकारी वकिलाचा युक्तिवाद कमकुवत ठरवून त्याला पोलीस कोठडी देऊ नये, अशी विनंती न्यायालयाला केली. 
 
Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

तिबेट, बंगालचा उपसागर आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

सोलापूर : कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली

पुढील लेख
Show comments