Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई

Webdunia
सोमवार, 13 डिसेंबर 2021 (22:13 IST)
औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी नियम आणखी कठोर करण्यात आले आहेत. एक लस घेऊन तारीख उलटूनही दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. जे नागरिक दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत त्यांनी 15 तारखेपर्यंत डोस न घेतल्यास 500 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वसुल करण्यात आलेल्या दंडाची 50 टक्के रक्कम ही पोलीस प्रशासन आणि 50 टक्के रक्कम मनपा फंडात जमा करण्यात येणार आहे. 15 डिसेंबरपासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. 
याआधी लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी औरंगाबादमध्ये पेट्रोल, गॅस, किराणा, कपडे खरेदीसाठी लसीकरण सक्तीचं करण्यात आलं होतं. तसंच लसीचा किमान एक डोस घेतल्याशिवाय दारू न देण्याचे निर्बंध लावण्यात आले होते. इतकंच नाही तर बारमध्ये बसूनही दारु पिता येणार नसल्याचे आदेश काढण्यात आले होते. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

बुधवारपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात होणार

हरतालिका तृतीयेला 3 उपाय करा, वैवाहिक जीवनातील समस्या लवकर दूर होतील

Mahabharat: या सुंदर अप्सरेला अर्जुनसोबत एक रात्र घालवायची होती पण नंतर दिला शाप

तुम्ही श्रीमंत होऊ शकाल की नाही, आरशात बघून जाणून घ्या...

कोणी चहा पिऊ नये? या लोकांसाठी Tea विषाप्रमाणे

सर्व पहा

नवीन

राजस्थानमध्ये सिमेंटने भरलेला ट्रेलर कारवर उलटला, आई-मुलासह 4 जणांचा मृत्यू

कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर राष्ट्रपती मुर्मू यांचे कठोर विधान

गुजरातमध्ये एका व्यक्तीने मित्राच्या 3 वर्षांच्या मुलीवर केला लैंगिक अत्याचार

कामाची वेळ संपल्यानंतर बॉसच्या कॉल किंवा मेसेजला उत्तर देणं बंधनकारक नाही, काय आहे हा नियम?

कुनो नॅशनल पार्कमधून पुन्हा दुःखद बातमी, नामिबियन नर चित्ता 'पवन'चा मृत्यू

पुढील लेख
Show comments