Marathi Biodata Maker

राहुल यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, पक्ष चालवत येत नाही ते देश काय चालवणार

Webdunia
सोमवार, 23 सप्टेंबर 2019 (10:04 IST)
भाजप सोबत सत्तेत असलेल्या एक नेत्याने राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केंद्रीयमंत्री रामदास आठले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. आठवले यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हि उभे केले आहे. आठवले यांनी म्हटले की, मागची पाच वर्षे देशात उत्तम  काम केले तरी देखील काहीजणांनी पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. तरीही देशाच्या जनतेने ठरवलं आहे की, मोदी शिवाय त्यांना दुसरा पर्याय अजूनतरी नाही. सोबतच यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करतांना आठवले म्हणतात की, जर राहुल गांधी आपलाच काँग्रेस  पक्ष व्यवस्थित सांभाळू शकत नसतील, तर ते देश कसा काय चालवतील? त्यांचा यामुळे  अमेठीतून पराभव झाला.या अगोदर आठवले यांनी म्हटले होते की, महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना, इतर पक्षांची महायुती २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत २४० ते २५० जागांवर विजयी होईल. त्यांनी हे देखील वक्तव्य केले होते. जागा वाटपावर भाजपा-शिवसेनेने छोट्या मुद्यांना सोडून दिले पाहिजे आणि आपल्या ताकदीच्या आधारे जागांचे वाटप करायला हवे व निवडणूक लढायला हवी असे म्हटले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदी यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये जिओ पवेलियनला भेट दिली

LIVE: मुलुंड मेट्रो अपघातावर एकनाथ शिंदे संतापले, अभियंता निलंबित

मुंबईतील मुलुंड येथे मेट्रो लाईन ४ मधील स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले, अभियंता निलंबित

रशीद खान टी-२० क्रिकेटमध्ये ७०० बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला

AI Impact Summit 2026 जागतिक एआय प्लॅटफॉर्मवर भारताचे सामर्थ्य प्रदर्शन

पुढील लेख
Show comments