Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गणेशोत्सवासाठी चाकरमानी ‘वेटिंग’वर!

Webdunia
गुरूवार, 5 मे 2022 (15:14 IST)
खेड: यंदा गणेशोत्सवाची धामधूम 31 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याने रेल्वे प्रशासनाने 28 एप्रिलपासून आरक्षणाची दारे खुली केली. आरक्षण सुरू होताच गणेशोत्सवात धावणाऱया चारही नियमित रेल्वेगाडय़ांचे आरक्षण काही मिनिटातच हाऊसफुल्ल झाले. तासन्तास तिकीट खिडक्यांवर उभे राहूनही गणेशभक्तांच्या पदरी निराशाच पडली. या चारही नियमित गाडय़ांचे प्रवासी ‘वेटिंग’वर असून त्यांच्या नजरा आता गणपती स्पेशल गाडय़ांकडे खिळल्या आहेत.
 
गणेशोत्सवात धावणाऱया नियमित गाडय़ांचे आरक्षण खुले करताच आरक्षित तिकिटांसाठी ऑनलाईन व तिकिट खिडक्यांवरही चाकरमान्यांची झुंबड उडाली. मात्र कोकणकन्या, तुतारी, मांडवी, जनशताब्दी एक्सप्रेस या चारही गाडय़ांचे आरक्षण काही मिनिटातच हाऊसफुल्ल झाल्याने तास्नतास तिकीट खिडक्यांसमोर उभे राहणाऱया गणेशभक्तांचा हिरमोड झाला. असंख्य प्रवाशांना ‘वेटींग’वर रहावे लागले आहे. चाकरमान्यांना आता ‘गणपती विशेष’ गाडय़ांचा आधार घ्यावा लागणार आहे.
 
सर्वच स्थानकात थांबणारी पॅसेंजर सोडावी
नियमित गाडय़ांना जास्त डबे जोडणे आवश्यक आहे. विशेष गाडय़ा सोडताना संपूर्ण एसी गाडय़ा सर्वप्रथम व त्यानंतर 15 दिवसांनी सामान्य गाडय़ा जाहीर कराव्यात. आरक्षण सुरू करताना तेवढय़ाच दिवसांचा फरक असायला हवा. मुंबई-चिपळूणनंतर मुंबई-रत्नागिरी व शेवटी मुंबई-सावंतवाडी/गोवा/मंगळूरु अशा क्रमाने विशेष गाडय़ा जाहीर कराव्यात व प्रत्येकी 2 ते 4 दिवसाच्या फरकाने आरक्षण सुरू करावे. यामुळे लांबच्या गाडय़ांमध्ये जवळच्या प्रवाशांची गर्दी होणार नाही. कोकण रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबणारी एखादी पॅसेंजर गाडीही सोडावी.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

नीरज चोप्राने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीमला पराभूत करून अंतिम फेरीत स्थान मिळवले

दिग्गज स्टीफन फ्लेमिंग यांच्या जागी अल्बी मॉर्केल यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

पाकिस्तानच्या कोळसा खाणीत मोठा अपघात, स्फोटात ३२ कामगार ठार

LIVE: महाराष्ट्र सरकार कडून 'अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत ७ हजार कोटी रुपयांना मंजुरी

भिवंडी मध्ये चार मजली इमारत कोसळली, 5 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

पुढील लेख
Show comments