rashifal-2026

मुंबईत पावसाचा जोर, पुढील दोन दिवस झमाझम

Webdunia
मुंबई - पहिला पाऊसच मुंबई शहर आणि उपनगरासाठी अनेक तक्रारी घेऊन येणार ठरला. शुक्रवारी पहिल्याच पावसाने झोडपले आणि पुढील दोन दिवसही मुंबई शहर, उपनगरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 
 
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरात व मध्य प्रदेशच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे. मागील एक दिवसापासून कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात काही 
 
ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र व विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.
 
या पावसामुळे अनेक तक्रारी नोंदवण्यात आलेल्या आहे ज्यात मुंबई शहरात आणि उपनगरात 6 ठिकाणी घरांच्या भिंती पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून अनेक ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत. आपत्कालीन 
 
नियंत्रण कक्षाहून प्राप्त माहितीनुसार 50 हून अधिक ठिकाणी झाडे कोसळ्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेक रस्ते तसेच बाजार पाण्याने तुंबले आहेत.
 
तसेच पहिल्या पावसातच लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहे. रेल्वे प्रशासनाचा रुळावर पाणी साचणार नाही हा दावा मात्र पहिल्याच पावसाने खोटा ठरविला आहे. रेल्वे मार्गात पाणी साचू नये म्हणून 
 
पंप मशीन बसविण्याची तरतूद केली असली तरी काही गाड्या ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तर लोकल 15 मिनिटे उशिराने धावत होत्या. 
 
सतत होत असलेल्या पावासामुळे अनेक जागी गुडघ्यांपर्यंत पाणी साचले आहे. वाहनांची गतीला ब्रेक लागले आहेत त्यामुळे ट्रॅफिक विस्कटलं आहे. जेथे-तेथे जाम लागत असल्यामुळे लोकं खोळंबून राहिले आहेत. पश्चिमी उपनगरात दोन वेगवेगळ्या घटनेत तीन लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

भोंदू बाबा अशोक खरात दहावीच्या गणितात नापास, नावही बदलले, गुणपत्रिका समोर आल्याने धक्कादायक खुलासा

काँग्रेसला मुख्यालय खाली करण्याचे आदेश

शिंदेकडून ठाकरेंचा साहेब असा उल्लेख

जालन्यात टोमॅटो शेतकरी संतप्त! २५ क्विंटल टोमॅटो रस्त्यावर फेकले

दिल्ली विधानसभेत बॉम्बची धमकी; १६ आरडीएक्स आयईडी ठेवल्याचा दावा, सुरक्षा यंत्रणा सतर्क

पुढील लेख
Show comments