Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाऊस..... पाऊस ......परतीचा प्रवास सात ते आठ दिवसांनी लांबला

Webdunia
शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (15:26 IST)
राज्यात परतीचा प्रवास लांबला आहे. त्यामुळे दोन दिवसांच्या कालावधीत केवळ दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागांत पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
 
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत मुंबई-पुण्यासह संपूर्ण राज्यासह देशातून मोसमी वारे माघारी जातील, अशी स्थिती सध्या निर्माण झाली. मात्र, त्याचवेळी दोन दिवसांच्या कालावधीत केवळ दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागांत हलक्या सरींची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात दोन दिवसात कोरडं हवामान राहील, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. अरबी समुद्रातील बाष्पामुळे मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सात ते आठ दिवसांनी लांबला.
 
परतीचा पाऊस लांबण्याची अनेक कारणे आहेत. समुद्राचे वाढलेले तापमान, कमी दाबाचा पट्टा तसेच ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात बांधकामे जास्त झाली आहेत. त्यामुळे तापमान सुद्धा जास्त असते, त्यामुळे त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टे तयार होतात. याचा थेट परिणाम हा  पावसावर झाल्याचे दिसून येत आहे. 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

लातूरमधील शाळेत घुसून तोडफोड करत मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ

इस्रोचे 101 वे मिशन अयशस्वी, पीएसएलव्ही रॉकेट तिसरा टप्पा पार करू शकले नाही

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

अजित पवारांनी लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप केले

महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

पुढील लेख
Show comments