Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईसह राज्याच्या सर्वच भागात पाऊस, जनजीवन विस्कळीत, शेतकरी संकटात

Webdunia
सोमवार, 14 डिसेंबर 2020 (16:32 IST)
मुंबईसह राज्याच्या सर्वच भागात आज पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सलग चौथ्या दिवशी पाऊस सुरू आहे. ऐन थंडीत पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झालंय. अवकाळी पावसामुळे शेतकरीही संकटात सापडला आहे. 
 
मुंबईसह ठाणे जिल्हा, नवी मुंबई, वसई विरार या भागातही पाऊस सुरू आहे. या भागातून मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे. अवकाळी पावसामुळे आंब्यासह इतर पिकं संकटात आहेत. तर नाशिक जिल्ह्यातही पावसाचा फटका शेतीला बसलाय. पावसामुळे द्राक्ष कांदा धोक्यात आलाय. धुळे, जळगावमध्ये दाट धुकं आहे. पुणे जिल्ह्यातही आंबेगाव तालुक्यात पावसासह धुकं पसरलं आहे.
 
रायगड जिल्ह्यात सकाळपासून पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रिमझिम तर काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. अलिबाग, माणगाव आणि रोहा तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या. तर महाड, म्हसळा, श्रीवर्धन, पेण परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

लाडकी बहीण योजना बंद करा’, संजय राऊत फडणवीस सरकारवर का भडकले?

LIVE: रायगड जिल्ह्यात खाजगी बसला अपघात

वैवाहिक वादामुळे भिवंडीतील महिलेने तीन मुलींसह केली आत्महत्या

'जर अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर त्यांनी महाविकास आघाडीत परत यावे', उद्धव गटाच्या नेत्याने दिली ऑफर

रायगडमध्ये बसला भीषण अपघात, ३५ प्रवासी जखमी

पुढील लेख
Show comments