Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ही तर अराजकतेकडे वाटचाल : राज ठाकरे

Webdunia
शनिवार, 13 जानेवारी 2018 (10:16 IST)

सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशांवरच न्याय मागण्याची वेळ येतेय, यावरून देश किती अराजकतेकडे चालला आहे याची कल्पना येते, अशी  प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरी येथे व्यक्‍त केली.

सरकार सर्वत्र नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. माध्यमेही उघडपणे बोलू शकत नाहीत. आता तर न्याय व्यवस्थेवरच नियंत्रण ठेवण्याचा सरकारकडून प्रयत्न झाल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जनतेच्या न्यायालयात येऊन आपली बाजू मांडल्यानंतर स्पष्ट होत आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडत आहे. त्यामुळे त्या न्यायाधीशांचा किती कोंडमारा झाला असावा, याचा अंदाज येऊ शकतो, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

सरकारच्या प्रत्येक ठिकाणच्या अतिक्रमणावर बोट ठेवताना राज ठाकरे यांनी सांगितले की, ‘अडीच माणसे देश चालवत आहेत.’ ही सर्व परिस्थिती देश अराजकतेकडे वाटचाल करत असल्याचे दाखवण्यास पुरेशी आहे. याचे परिणाम सरकारला भोगावे लागतीलच, असेही ते यावेळी म्हणाले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments