Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

१८ तारखेनंतर भूमिका मांडणार- राजू शेट्टी

Webdunia
गुरूवार, 17 नोव्हेंबर 2022 (19:34 IST)
शेतकऱ्यांनो आता शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, प्रश्न सुटले नाहीत तर 18 तारखेपासून काय करायचे ते मी सांगतो, असे थेट राज्य सरकाराला थेट आव्हान देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन केले.
 
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला ऊसतोड कामगार, वाहन चालक आणि साखर कारखानदार यांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन शेट्टी यांनी केले. स्वाभिमानीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना हे आवाहन केले आहे.
 
आज आणि उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊसतोड बंद आंदोलन होणार आहे. यंदाच्या हंगामातील स्वाभिमानीचे हे पहिलेच आंदोलन आहे. केंद्र सरकारने साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल 3500 करावा, इथेनॉलच्या दरात 5 रुपयांची वाढ करावी आणि ऊस परिषदेत केलेली एफआरपी अधिक 350 रुपये ही मागणी कारखानदारांनी पूर्ण करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होतंय. कारखानदारांना याबाबत काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांनी आवाहन केलं आहे. त्यामुळे कारखानदारांकडून कसा प्रतिसाद मिळतो त्यावर स्वाभिमानीची पुढील रणनीती ठरणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

तिबेट, बंगालचा उपसागर आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

सोलापूर : कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली

पुढील लेख
Show comments