Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी नोंदणी सुरु

Webdunia
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (08:13 IST)
महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा अर्थात एनटीएस स्पर्धेच्या आगामी परीक्षेसाठी नोंदणी सुरु झाली आहे. ८ ऑक्टोबरपासून परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यस्तरावरील परीक्षा १३ डिसेंबर २०२० रोजी होणार असून राष्ट्रीयस्तरावरील परीक्षा १३ जून २०२१ रोजी होणार आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठी २५ ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
 
महाराष्ट्र परीक्षा परिषेदेने याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. सदर परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांनी ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. इयत्ता १०वीच्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. ८ ते २५ ऑक्टोबर दरम्यान प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तसेच विलंब शुल्कासह ४ नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरता येणार आहे. बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी असे दोन विषय मिळून २०० गुणांची परीक्षा होणार आहे. त्याचप्रमाणे मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू, कन्नड व तेलगू अशा सात भाषांमध्ये परीक्षा देता येणार आहे. परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग पद्धत नसल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.mscepune.in किंवा http://nts.mscescholarshipexam.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी असे आवाहन परिषदेने केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

LIVE: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार

भारताने बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला

पुढील लेख
Show comments