Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठेकेदाराच्या भल्यासाठीच शिवाजीनगर उड्डाणपूल कामाला वारंवार मुदतवाढ – एकनाथ खडसे

Webdunia
मंगळवार, 26 जुलै 2022 (15:35 IST)
गेल्या काही वर्षांपासून शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. ते अपूर्णावस्थेत आहे. जवळपास एक लाखावर लोकसंख्येला त्यामुळे भरपूर त्रास होत आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या उड्डाणपुलाचे काम रखडलेले आहे. तरीही केवळ ठेकेदाराचे भले होण्यासाठी वारंवार मुदतवाढ दिली जाते. जिल्ह्यात वाळूमाफियांनी गोंधळ घातलेला आहे. मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी होत आहे. प्रशासन त्यांच्यासमोर हतबल झाल्यासारखे चित्र असल्याचा आरोप आमदार एकनाथराव खडसे यांनी केला.
 
त्यांची सोडवणूक करण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेबाबत पत्रकारांना माहिती दिली. जळगाव-अजिंठा रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरूच आहे. शिवाजीनगर उड्डाणपूल व जळगाव ते अजिंठापर्यंतच्या महामार्गाचे काम मुदतीत पूर्ण झालेले नाही. जळगाव शहरात राष्ट्रीय महामार्गावरील सर्कलच्या आजूबाजूला अतिक्रमण झालेले आहे. गेल्या आठवड्यात तेथे अपघात झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नांवर लक्ष द्यावे, अशी विनंती खडसेंनी केली. या संदर्भात तातडीची बैठक घेऊन सूचना देण्यात येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पुणे: विहिरीत पडलेला बिबट्याच्या पिल्लूला वाचवल्यानंतर जंगलात सोडले

बुलढाणा : लग्नात तलवार घेऊन नाचले, शिवसेना युबीटी आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल

मुस्लिम अभिनेते आणि अभिनेत्रींच्या बहिष्कारावर संजय निरुपम यांनीही प्रतिक्रिया दिली

LIVE: मुंबई गुन्हे शाखेने ४ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले

ट्रम्प यांच्या दाव्यावर संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारवर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments