Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनिल देशमुखांचे भवितव्य ठरविणाऱ्या चांदीवाल कमिशनचा अहवाल ; काय आहे त्यात?

Webdunia
बुधवार, 27 एप्रिल 2022 (08:06 IST)
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या लेटरबॉम्बची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या चांदीवाल कमिशनचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सपुर्द करण्यात आल्याची माहिती पुढे आले आहे. या अहवालाच्या निष्कर्षाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर आरोप करताना त्यांनी 100 कोटी रुपये वसुलीचा आदेश देण्यात आल्याचं सांगितलं होतं. चांदीवाल कमिशनने या सर्व आरोपांची चौकशी करताना अनेक पुरावे, अनेक साक्षीदार तपासले. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 20 मार्च 2020 रोजी एक पत्र लिहून मुंबईतील 1750 बार आणि रेस्टॉरंटमधून दरमहा 100 कोटींची वसूली करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याचा आरोप करत एक लेटरबॉम्ब फोडला होता.
 
देशमुखांनी हे काम पोलीस निरीक्षक सचिन वाझेकडे सोपवल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं होतं. या राजकीय भूकंपानंतर देशमुखांवर चोहोबाजूनं टीका करण्यात आली. त्यातच देशमुखांना आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामाही द्यावा लागला. मुंबई उच्च न्यायालयानंही याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेची दखल घेत सीबीआय चौकशीचे आदेश दिले. तर राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती के. यू. चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एका चौकशीआयोगाची स्थापना करत याची समांतर चौकशी सुरू केली. सुत्रांच्या मते आयोगाने देशमुख यांना क्लीन चीट दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: तिरंगा यात्रेत हिंदुस्थान झिंदाबादने भांडुप गुंजला

पंजाबमध्ये २ पाकिस्तानी हेरांना अटक, ISI ला लष्करी तळांची माहिती देत ​​होते

धबधब्यामध्ये आंघोळ करणे चार डॉक्टरांना महागात पडले, एकाचा बुडून मृत्यू

भारतात कोविड परतला, मुंबईत कर्करोग आणि किडनीच्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

नागपूर : व्यापाऱ्यांनी १५५ कोटी रुपयांचा अपहार केला, गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक

पुढील लेख
Show comments