Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात निर्बंधांचा निर्णय आज किंवा उद्या घेतला जाऊ शकतो

Webdunia
बुधवार, 29 डिसेंबर 2021 (13:25 IST)
26 डिसेंबर 2021 म्हणजेच रविवारी मुंबईत 922 नवीन कोरोनारुग्णांची नोंद करण्यात आली. तर 28 डिसेंबरला 1377 कोरोनारुग्ण सापडले आहेत.
 
याबाबत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यामध्ये टोपे म्हणाले, "अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या आज (29 डिसेंबर) 2000 च्या पुढे येण्याची शक्यता आहे. मुंबईचा पॅाझिटिव्हीटी रेट 4 टक्के येऊ शकतो. हे अजिबात चांगलं नाही. आपल्याला काळजी घ्यावी लागेल. काळजी घेतली नाही तर किंमत चुकवावी लागेल. निर्बंध वाढवण्याची गरज निर्माण होऊ शकेल. मुख्यमंत्री आणि आरोग्यविभाग याबाबत निर्णय घेतील. परिस्थिती पहाता निर्बंधाबाबत आज किंवा उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे."
 
लसीकरणाबद्दल बोलताना राजेश टोपे म्हणाले, "साडेपाच कोटी लोकांना दुसरा डोस मिळालाय. लहान मुलांसाठी कोव्हॅक्सीन मिळणार असून शालेत जाऊन लस देता येईल का याबाबत विचार सुरू आहे. बूस्टर कोणता द्यायचा याबाबत अद्याप निर्णय केंद्राने ठरवलेला नाही. त्याच लशीचा बूस्टर द्य़ायचा की दुसऱ्या लशीचा याबाबत निर्णयाची वाट पहात आहोत. लाट असली तरी महाराष्ट्र सज्ज आहे. आपली तयारी आहे. घाबरून जाण्याचं कारण नाही."
 
महाराष्ट्रात कोरोनासंसर्गाची तिसरी लाट जानेवारी महिन्यात येऊ शकते अशी भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली होती. येणारी संभाव्य तिसरी लाट ओमिक्रॉन व्हेरियंटची असेल असं तज्ज्ञ म्हणतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात वारकरी संतांचा मेळा, ७ जून रोजी पालखी सोहळा

मुस्लिम पक्षाला शाही जामा मशीद सर्वेक्षण प्रकरणात मोठा धक्का, उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Covid-19 Alert: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लक्षणे काय आहेत? देशात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली

भारताच्या पुनर्जागरणात साईबाबांचे योगदान, शिर्डी मंदिराला भेट दिल्यानंतर संघ प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान

पुढील लेख
Show comments