महाराष्ट्र सरकारचे मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपूरमधील आंदोलनस्थळाला भेट देऊन रोहित पवार यांची भेट घेतली. रोहित म्हणाले, "मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो, त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की या जाचक अटी हटवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी मुंबईत बैठक घेतली जाईल." यानंतर रोहित पवार यांनी आपले तीन दिवसांचे उपोषण तात्पुरते थांबवल्याची घोषणा केली.सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलं परंतु अटीशर्ती टाकल्यामुळं बहुतांश शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार होते आणि हा एकप्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचाही अवमान आहे, ही गोष्ट पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरु करुन आम्ही… pic.twitter.com/RmmD1deg0q
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 15, 2026