Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुळा कालव्यातून सिंचनासाठी ६ जानेवारीपासून आवर्तन

Webdunia
मंगळवार, 4 जानेवारी 2022 (21:31 IST)
अहमदनगर जिल्हा ला वरदान असलेल्या मुळा डाव्या कालव्यातून सिंचनासाठी दिनांक ६ जानेवारी पासून आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी दिली.
यावर्षी झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. तसेच लाभक्षेत्रातही समाधानकारक पाऊस झाल्यामुळे विहीरींच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली होती.
त्यामुळे आजपर्यत आवर्तनाची आवश्यकता भासली नाही. परंतू आता विहीरींची पाणी पातळी कमी होऊ लागल्यामुळे डाव्या कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांकडून आवर्तनाची मागणी करण्यात येत होती.
परंतू यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक झालेली नसल्यामुळे व या कमिटयांचे अध्यक्ष जिल्हयाचे पालकमंत्री असल्याने आर्वतन सोडण्याकरीता कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने
आयोजित करण्याची मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे केली होती.तसेच याबाबत त्यांच्याशी दि . ४ जानेवारी रोजी दूरध्वनीव्दारे चर्चाही केली होती.
त्यानुसार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुळा डाव्या कालव्याच्या आवर्तनास मंजूरी दिलेली असून हे आवर्तन दि .६ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments