Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘आरपीआय’ला सत्तेत चांगला वाटा मिळाला पाहिजे-रामदास आठवले

Webdunia
बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (07:58 IST)
रामदास आठवले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यात चर्चा झाली. या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भाजपासोबत निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी ‘आरपीआय’ला सत्तेत चांगला वाटा मिळाला पाहिजे, अशी मागणी आठवलेंनी फडणवीसांकडे केली आहे.
 
‘आरपीआय’ हा पक्ष २०१२ पासून भाजपासोबत आहे, त्यामुळे तुमच्याकडे दुर्लक्ष होणार नाही. आरपीआयला नक्कीच सत्तेचा वाटा मिळेल, अशी भूमिका फडणवीसांनी घेतली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी दिली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आम्ही कसल्याही परिस्थितीत जिंकणार आहोत. आरपीआयची सर्व ताकद भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत असेल, अशी प्रतिक्रिया आठवलेंनी दिली आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

आधी सुरक्षारक्षकाची हत्या, मग व्यावसायिक कुटुंबाला लक्ष्य…जुहूमध्ये भीषण कटाचा पर्दाफाश; पाच आरोपींना अटक

कल्याणमध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; सात तासांत १२५ हून अधिक लोकांना चावा

पिंपरी-चिंचवडमध्ये एका सोसायटीत खेळत असताना चिमुकलीला कारने चिरडले

विमानतळावर नोकरीच्या आमिषाने ऑनलाइन अर्ज भरण्यास भाग पाडले! संभाजीनगरमधील हजारो विद्यार्थ्यांची फसवणूक

महाराष्ट्रात दूध महाग होणार! ११ ऑगस्टपासून प्रति लिटर २ रुपयांची वाढ

पुढील लेख
Show comments