Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विधान परिषद निवडणूक: सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे

Webdunia
सोमवार, 13 जून 2022 (16:02 IST)
राज्यसभेच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडींनंतर झालेल्या भाजपच्या विजयाने विधान परिषदेसाठी समीकरण तापलं आहे. विधान परिषद बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.
 
विधान परिषदेसाठी 20 जून रोजी होणार मतदान होणार आहे. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार आहेत.
 
भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड रिंगणात आहेत. शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी निवडणुकीला उभे आहेत. राष्ट्रवादीने रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांची नावं जाहीर केली आहेत. काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप रिंगणात आहेत.
 
"आमची अपेक्षा अशी होती की सत्तारुढ पक्षाने निवडणूक बिनविरोध करावी. पण ती बिनविरोध होऊ शकली नाही. आम्ही 5 जागा लढवतोय. सत्तारुढ पक्षात खूप असंतोष आहे. या असंतोषाला जागा हवेय म्हणून आम्ही पाचवी जागा लढवतोय. निवडणूक सोपी नाही, पण आम्ही पाचवी जागा निवडून आणू", असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
 
"सत्ताधारी पक्षाने माझ्याशी चर्चा केली. काँग्रेसने एक उमेदवार मागे घ्यावा अशी चर्चा होती पण तसं झालेलं नाही. महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव आहे. महाविकास आघाडीत असंतोष आहेच".
 
"जोकरसारखे स्टेटमेंट रोजच करत असतात. आमचा पाचवा उमेदवार निवडून येईल. सहा जागा लढवायच्या की पाच यावर चर्चा झाली. अध्यक्ष चंदक्रांतदादा पाटील यांच्या सूचनेप्रमाणे पाच जागांवर लढणार आहोत", असं फडणवीस म्हणाले.

भाजपकडे सध्या 106 जागांचं संख्याबळ असून काही अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आहेत. विधानपरिषदेत प्रत्येक आमदाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची 27 मते आवश्यक आहेत.
 
या गणितानुसार, भाजपचे पहिले 4 उमेदवार सहज निवडून येतील. तर पाचव्या जागेवरील प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी काही मतांची तजवीज करावी लागेल. चार जागांसाठी 108 मतांची गरज लागेल. त्यामुळे प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी आणखी 27 मतांची जुळवाजुळव भाजपला करावी लागणार आहे. पाचवी जागा जिंकण्यासाठी भाजपला 130 पेक्षा जास्त मतांची गरज लागेल. यामुळे भाजपला बरीच मेहनत करावी लागणार आहे. हे लक्षात घेऊन भाजपने सदाभाऊ खोत यांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं.
 
सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या पाठिंब्यावर 9 जून रोजी अर्ज दाखल केला होता. फडणवीसांच्या सांगण्यानुसार अर्ज भरलाय. त्यांनी सांगितलं तर पुन्हा माघारही घेऊ, असंही त्यावेळी सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

अतिशी ने दिल्लीच्या नववे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

तरुणांना सरकार दरमहा 1000 रुपये देणार, कोणत्य राज्यातील काय आहे योजना, कसा मिळणार लाभ?

नेहमी आपल्या बॅगेत कंडोम ठेवायची ! या महिला गव्हर्नरचे 58 कर्मचाऱ्यांशी संबंध होते

धारावीतील बेकायदा मशिदीचे बांधकाम हटवण्यासाठी गेलेले बीएमसीचे पथक परतले, मुदत वाढवली

मुंबईतील नालासोपारा रेल्वे स्थानकावर तिकीट मागितल्यावर टीसीला हॉकी स्टिकने मारहाण

पुढील लेख
Show comments