Festival Posters

संभाजी भिडे विरोधात पुरावा नाही, भिडे यांना क्लीनचीट

Webdunia
बुधवार, 28 मार्च 2018 (10:50 IST)

कोरेगाव भीमा प्रकरण अजूनही गाजते आहे. यावर आंबेडकर यांनी आणलेला एल्गार मोर्चा मुळे सरकारला चर्चेस भाग पाडले आहे. मात्र आज मुख्यमंत्री एल्गार परिषदेचा आरोप फेटाळून लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भिडे गुरुजींना 'क्लीन चिट' दिली आहे. त्यामुळे आता सरकार भिडे यांना पाठीशी घालत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत विधानसभेत झालेल्या चर्चेवर मुख्यमंत्री-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केलं. त्यावेळी कालचा एल्गार मोर्चा आणि भिडे गुरुजींना अटक करण्याची मागणी, याबाबतही त्यांनी सरकारची बाजू मांडली आहे. 

मुख्यमंत्री निवेदन देतांना म्हटले आहे की संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना दंगल घडवताना पाहिल्याची तक्रार एका महिलेनं केलीय. ती पोलिसांनी नोंदवून घेतली आणि कारवाईही सुरू मात्र, चोकसी नंतर आजपर्यंत जेवढे पुरावे समोर आलेत, त्यात संभाजी भिडे गुरुजींविरोधात एकही सबळ पुरावा सापडलेला नाही. या दंगलीत त्यांचा सहभाग असल्याचं स्पष्ट होत नाही', असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत नमूद केल आहे. मात्र भिडे यांची चौकशी बंद केली नसल्याचंही त्यांनी सांगितल आहे.  भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांनी आपल्याकडे एक फेसबुक पोस्ट दिली आहे. भिडे गुरुजींच्या सांगण्यावरूनच दंगल भडकल्याचा दावा त्यांनी या पोस्टच्या आधारे केला आहे. त्या पोस्टचीही चौकशी केली जाईल, असा निर्वाळा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे आता अनेक प्रश्नांना बगल देणारे मुख्यमंत्री पुढे कसे प्रश्नाना सामोरे जातील हे पहाणे उस्तृकेचे आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

विनाहिजाब कॉन्सर्ट सादर केल्याबद्दल इराणी गायिकेला ७४ कोडे मारण्याची क्रूर शिक्षा!

मान्सून लांबणीवर! ७ राज्यांत पारा ४० पार; जाणून घ्या पाऊस कधी पडणार?

Reliance Industries दोन लाख हरित रोजगार निर्माण करेल, अनंत अंबानी यांची घोषणा; नवीन ऊर्जा व्यवसायाचा परिणाम रिलायन्सच्या कमाईमध्ये दिसून येईल

देशातील सर्वात मोठा संरक्षण अणु-अंतराळ कॉरिडॉर नागपूरच्या सावनेरमध्ये उभारला जाणार; सरकारने अधिसूचना जारी केली

मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा उपोषणाचा इशारा दिला

पुढील लेख
Show comments