Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

क्रांती म्हणाल्या, आम्ही राजभवनावर रडायला गेलो नव्हतो

Webdunia
मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (21:57 IST)
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सातत्याने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांवर आरोप करताना दिसत आहेत.या आरोपांच्या अनुषंगाने  मंगळवारी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती वानखेडे, वडील ज्ञानदेव वानखेडे आणि बहीण यास्मिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले होते. 
 
यावेळी क्रांती वानखेडे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, ‘आम्ही राजभवनावर रडायला गेलो नव्हतो. आम्ही आमचं निवदेन राज्यपालांना दिलं. ही एक सत्याची लढाई आहे. या लढाईत आम्हाला ताकदीची गरज आहे. त्या ताकदीचे आश्वासन आम्हाला राज्यपालांनी दिले.’
 
पुढे क्रांती म्हणाल्या की, ‘ज्या लोकांना असं वाटतं असेल हे लोकं गरीब बिचारे असं इकडून तिकडे फिरतायत. तसं नाही आहे. आम्ही योद्धा आहोत, सत्याचे योद्धा आहोत. आम्ही असंच लढत राहणार. आम्हाला राज्यपालांकडून चांगले आश्वासन निश्चित मिळाले आहे. स्फूर्ती मिळाली आहे. आम्ही जास्तीत जास्त सत्यासाठी निश्चित लढणार आहोत आणि विजय आमचाच होईल.’
 
‘कुठलेही पुरावे न दाखवता कोणत्याही स्तराला जाऊन आमच्या कुटुंबियातील सदस्यांवरील इज्जत अब्रुवर हल्ला केला जातोय. या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर ठेवल्या. काही नाही थोडं धैर्य ठेवा, तुम्ही लढा, सत्याचाच विजय होणार, असा सकारात्मक प्रतिसाद राज्यपालांकडून मिळाला आहे. पुढे काय होत ते पाहूयात,’ असं क्रांती म्हणाल्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात वारकरी संतांचा मेळा, ७ जून रोजी पालखी सोहळा

मुस्लिम पक्षाला शाही जामा मशीद सर्वेक्षण प्रकरणात मोठा धक्का, उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Covid-19 Alert: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लक्षणे काय आहेत? देशात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली

भारताच्या पुनर्जागरणात साईबाबांचे योगदान, शिर्डी मंदिराला भेट दिल्यानंतर संघ प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान

पुढील लेख
Show comments