Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता चोख उत्तर देण्याची वेळ आली आहे : संजय राऊत

Webdunia
मंगळवार, 11 जुलै 2017 (16:56 IST)
अमरनाथ यात्रेवर झालेला हल्ला हा देशावरचा हल्ला आहे, दिल्लीत बसलेल्या सरकारवरील हल्ला आहे. त्यामुळे त्याबाबत केवळ निंदा करण्याची नव्हे तर चोख उत्तर देण्याची वेळ आली आहे, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडली.
 
सर्जिकल स्ट्राईक, नोटाबंदीने काहीच फरक पडला नाही. पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा बंदोबस्त करायला हवा, असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले. तसेच संजय राऊत यांनी 1996 सालच्या अमरनाथ यात्रेची आठवण सांगितली. 1996 साली अमरनाथ यात्रेवर संकट होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अमरनाथ यात्रेकरुंच्या केसालाही धक्का लागला तर मुंबईच नव्हे, तर देशातून हज यात्रेसाठी एकही विमान जाऊ देणार नाही असे ठणकावले होते. त्यानंतर अमरनाथ यात्रा सुरळीत झाली होती. तशीच कडक भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.. केंद्रातील भाजप सरकारने याला चोख उत्तर द्यायला हवे. चर्चेपेक्षा हल्ल्याचा बदला घ्या. या देशातील 80 कोटी हिंदूंचा वाली कोण, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments