Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संजय राऊतांचा बंडखोरांना सल्लाः स्वत:ला वाघ मानता ना, मग बकरीसारखं बें बें करू नका

Webdunia
शनिवार, 25 जून 2022 (12:15 IST)
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज शनिवारी पुन्हा एकदा आपल्या पक्षाची बाजू मांडली आहे. बंडखोर आमदारांची संरक्षण व्यवस्था काढल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यावर आज आऱोप-प्रत्यारोप, नव्या घडामोडी घडत आहेत.
 
"राष्ट्रीय कार्यकारिणी कोणत्याही पक्षासाठी महत्त्वाची असते. महत्त्वाचे निर्णय होतील. पक्षाच्या विस्तारासंदर्भात चर्चा करू. काही नव्या नियुक्त्या करू. शिवसेना मोठा पक्ष आहे. हा पक्ष तयार करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मेहनत घेतली आहे.
 
बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे तसंच सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. सहजपणे कोणी शिवसेनेला हायजॅक करू शकत नाही. आम्ही आमच्या रक्ताने घडवलेला पक्ष आहे.
 
शेकडो लोकांनी बलिदान दिलं आहे. पैशाच्या बळावर कोणी पक्ष विकत घेऊ शकत नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीत या सगळ्यावर चर्चा होईल", असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.
 
"भाजपसोबत अजून कोणतीही बोलणी झालेली नाहीत. उपाध्यक्षांच्या निर्णयाबाबत आम्ही राज्यपालांना पत्र पाठवतोय. विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहिलंय. तुमची कारवाई चुकीची आहे. पण त्यांचं उत्तर आलेलं नाही", असं त्यांनी सांगितलं.
 
शिरसाट पुढे म्हणाले, "उद्धव ठाकरेंनी शिंदे साहेबांचं गटनेतेपद काढलं. प्रतोद बदलला. आता कार्यकारिणीची बैठक आहे. याचा अर्थ त्यांना बोलायचं नाही. गट पक्षात विलिन करावा लागेल असं नाही. 2/3 बहुमत आम्ही सिद्ध केलं तर स्वत:च्या पक्षाची स्थापना करू शकतो. आम्ही शिवसेनेचे आहोत. शिवसेना आमचा पक्ष आहे. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आम्ही तसं करू शकतो पण आम्ही करणार नाही.
 
आम्हा शिवसैनिक आहेत. दुसऱ्या पक्षाचा विचार केला नाही. गुवाहाटीला गेलो म्हणजे काही भीती आहे असं नाही. सर्वजण एकत्र असावेत यासाठी आहोत. भारतात कुठेही गेलो तरी लोक फॉलो करणार.
 
आम्हाला मुख्यमंत्रिपदाबाबत आक्षेप नाही. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदावरून उतरावं ही आमची कधीच मागणी नव्हती नाहीये. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडा अशी मागणी. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत. ते झाले तर काहीच अडचण नाही
 
"उद्धव ठाकरेंना अजूनही नेता मानतो. आम्ही संयमाने घेतोय. आम्ही डगमगलेलो नाही. आज दुपारी बैठक आहे. उपाध्यक्षांवर हक्कभंग आणला आहे. त्याबाबत चर्चा झाली. आम्ही नोटीस दिली आहे.
 
आमदारांशी चर्चा करण्याची ते धडपड करतायत. त्यांना करूद्यात. आम्ही पक्ष वाढवायला निघालोय. बुडवायला नाही", असं शिरसाट म्हणाले.
 
भाजप अस्पृश्य होता तेव्हा आम्ही साथ दिली- मुख्यमंत्री
"भाजप अस्पृश्य होता तेव्हा आम्ही त्यांना साथ दिली. कोणीही त्यांच्याबरोबर जायला तयार नव्हतं तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. हिंदू मतांचं विभाजन होऊ नये यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही आता याचा परिणाम भोगत आहोत", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री बोलत होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊतही या बैठकीला उपस्थित होते.
 
एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या बंडामुळे राज्यात निर्माण झालेल्या सत्ता संकटासंदर्भात तोडगा काढण्यासाठी शिवसेनेनं आज दुपारी एक वाजता राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे.
 
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, "आम्ही अशा लोकांना तिकीट दिलं जे जिंकून येणार नव्हते. आम्ही त्यांना तिकीट देऊन जिंकवलं. पण आता आमच्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसला आहे. दुसरीकडे शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे.
 
बंडखोर आमदार भाजपबरोबर जाण्याबाबत बोलत आहेत. ज्या पक्षाने आमचा पक्ष आणि कुटुंबाला बदनाम केलं त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही".
 
शेरास सव्वाशेर भेटतो असं सांगतानाच मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेना तलवारीसारखी आहे. म्यानात ठेवली तर त्याला गंज चढतो. जर बाहेर काढली तर ती तळपते, चमकते. आता ही तलवार चमकवण्याची वेळ आली आहे.
 
जे आमदार बंडात सहभागी होऊ इच्छितात ते जाऊ शकतात. पण जाण्याआधी आमच्याकडे या, बोला मग जा. ज्यांनी आम्हाला सोडलं त्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यावाचून गत्यंतर नाही.
 
"काही दिवसांपूर्वी काही गोष्टींबाबत मला संशय आला म्हणून मी एकनाथ शिंदे यांना फोन करून म्हटलं की पक्ष पुढे नेण्याचं कार्य सुरू ठेवा. जे आता सुरू आहे ते योग्य नाही. ते मला म्हणाले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. आमदारांचं म्हणणं आहे की आपण भाजपबरोबर जावं. तुम्हाला मी अयोग्य अथवा अकार्यक्षम वाटत असेल तर मला तसं सांगा. मी पक्ष सोडायला तयार आहे. आतापर्यंत तुम्ही माझा सन्मान केला आहे कारण बाळासाहेबांनी तसं करायला सांगितलं होतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments