Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाडमध्ये एसडीआरफचा बेस कॅम्प उभारणार

Webdunia
बुधवार, 28 जुलै 2021 (23:25 IST)
कोकणात वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाडमध्ये एसडीआरफ (NDRF)चा बेस कॅम्प उभारण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिलीय. केंद्राकडे एनडीआरएफचा बेस कॅम्प उभारण्याची मागणी केली आहे. मात्र केंद्राच्या निर्णयात अडथळे येत असतील तर राज्य सरकार एसडीआरएफचा कॅम्प उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच दरळ कोसळल्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या तळीये गावाचं पुढच्या सहा महिन्यांत पुनर्वसन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.  राज्य मंत्रिमंडळाच्या  पार पडलेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना आदिती तटकरे यांनी  हि माहिती दिली. 
 
जिथे आता गाव होते त्याच्या जवळच पुनर्वसन केलं जावं अशी मागणी दुर्घटनाग्रस्त तळीये गावातील लोकांची आहे. पुनर्वसनाच्या विषयावर ग्रामस्थांबरोबर चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी स्थानिकांना आश्वासित केलेलं होतं, की त्यांच्या इच्छेनुसारच त्यांच्या पूनर्वसनाबाबत योग्य तो निर्णय घेईल. तळीये गावातील लोकांचं पुनर्वसन त्यांनी सांगितलेल्या जागी 6 महिन्यात केले जाईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments