Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सेल्फीच्या नादात संपूर्ण कुटुंब वाहून गेले

Webdunia
गुरूवार, 23 ऑगस्ट 2018 (09:10 IST)
बुलढाणा  जिल्ह्यातील खिरोडा येथे पूर्णा नदीजवळ फोटो काढताना पाण्यात पडल्याने संपूर्ण कुटुंबच वाहून गेल्याची घटना घडली आहे. राजेश चव्हाण पत्नी व मुलासह (10) पाण्यात वाहून गेले आहेत. चव्हाण जळगावमधील जामोद येथील बुलढाणा अर्बन पतसंस्थेत नोकरीला आहेत. पत्नी व मुलासह ते शेगावला निघाले होते. पण खिरोडाजवळ येताच पूर्णा नदीजवळ सेल्फी काढण्याचा त्यांना मोह झाला. नदीकाठाजवळ उभे राहून ते तिघे सेल्फी काढत असताना पाण्यात पडले. पाण्याला वेग असल्याने ते प्रवाहात दूरपर्यंत वाहून गेल्याचे समजते. दरम्यान या घटनेबदद्ल कळताच संग्रामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस स्थानिकांच्या मदतीने चव्हाण कुटुंबीयांचा शोध घेत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments