Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना 92 व्या वर्षी कॅन्सर, केले ‘हे’ आवाहन

Webdunia
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (16:10 IST)
फोटो साभार - सोशल मीडिया 
महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी सत्यशोधक चळवळीतील झुंजार नेतृत्व असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव  यांना वयाच्या 92 व्या वर्षी कॅन्सरची लागण झाली आहे. त्यांनी एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, वय वर्षे 92 सुरु आहे, हाडे ठिसूळ झालीत, मणकाही त्रास देतोय, निसर्ग नियमाप्रमाणे वाढत्या वयाबरोबर काही व्याधी मागे लागल्या आहेत, असं सांगत कॅन्सरची लागण झाल्याचे डॉ. बाबा आढाव  यांनी सांगितले आहे. तसेच लवकर मी या आजारावर मात करेन, असा विश्वासही डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केला आहे.
 
काय म्हटले निवेदनात
 
माझ्या भावंडांनो, सध्या मी घरीच आहे. त्याचं कारण मी थोडा आजारी आहे. आजाराचं कारण जे आहे ते तुम्हाला कळावं त्यासाठी माझं हे छोटेसे निवेदन तुम्हा सर्वांच्या माहितीकरिता. सध्या मला 92 वर्षे चालू आहे. तरीसुद्धा माझी तब्येत अत्यंत सुदृढ आहे. परंतु निसर्ग नियमाप्रमाणे वाढत्या वयाबरोबर काही व्याधीही मागे लागल्या आहेत. हाडे ठिसूळ झाली आहेत आणि अश्या ठिसूळ झालेल्या पाठीचा मणका  त्रास देतोय. त्याची योग्य ती आधुनिक तपासणी झाली आहे.
 
तपासणीत हाडांच्या ठिसूळपणा बरोबरच काहीशी कॅन्सर सारख्या व्याधीची लागण झाल्याचे उजेडात आले आहे. 92 वर्षात उपचाराला मर्यादा आहेत. अभिजीत वैद्य (Abhijeet Vaidya) हे माझे कुटुंब डॉक्टर आहेत. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे तसेच डॉ.राजेंद्र कोठारी , डॉ. विजय रमणम या सर्वांनी उपचाराची शर्थ चालवलेली आहे. माझ्या मते हे सगळं निसर्ग नियमाप्रमाणे घडतंय, त्यासाठी आगळं वेगळं काही करण्याची गरज नाहीये. त्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत.
 
मात्र माझ्या हालचालीवर मर्यादा आलेल्या आहेत. माझी खात्री आहे की मी यातून बाहेर पडेल व माझं रुटीन सुरू राहील. कृपया आपण कोणीही चिंता बाळगू नये व मला भेटण्याची घाई करू नये. कारण या आजारामूळे व त्यावरील औषधोपचारामूळे व्यक्तीची प्रतिकारशक्ती (Immunity) कमी होत जाते. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होणं माझ्या तब्येतीला धोकादायक ठरू शकते. बसल्या जागेवरून जे काय सहकार्य तुम्हाला करता येईल ते ऑनलाईन करेन. वेळोवेळी मी तुम्हाला तब्येतीची खुशाली कळवत राहीलच, असे डॉ. बाबा आढाव यांनी म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments