Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकार शेतीचे अर्थकारण संपुष्टात आणतेय- शंकर अण्णा धोंडगे

Webdunia
मागील तीन वर्षांपासून शासनाच्या रडारवर राज्यातील शेतकरी आहेत. शेतीचे अर्थकारण संपुष्टात आणण्यासह शेतकऱ्यांना भिकारी करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे, अशी टीका राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्याक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी केली आहे. राष्ट्रवादी किसान सभेतर्फे ऑगस्ट क्रांतिदिनापासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवाग्राम ते नाशिकदरम्यान शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान यात्रा काढण्यात येत आहे. यानिमित्ताने आज मठपिंपळगाव (ता. अंबड, जि. जालना) येथे शेतकरी, शेतमालाच्या यांची महासभा झाली.
 
शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार केवळ पोकळ आश्वासनांची खैरात करण्यासह फसव्या घोषणा करत असल्याचा आरोप धोंडगे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब कृषीमंत्री असताना जे निर्णय घेतले होते, ते सर्व निर्णय या सरकारने बदलून टाकले आहेत, अशी टीका धोंडगे यांनी केली. 
 
व्यावसायिकांप्रमाणे शेतकऱ्यांनादेखील तारण जमिनीच्या मूल्यांकनाच्या ७० टक्के कर्ज उपलब्ध करून द्यावे, आर्थिक, सामाजिक सुरक्षा कायदा करून शेतकऱ्यांचे उत्पन्न किमान चतुर्थश्रेणीच्या कर्मचाऱ्यांइतके सुरक्षित करा आदी मागण्यांसाठी हे अभियान सुरु केल्याचे धोंडगे यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments