Festival Posters

फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या रडारवर - शंकरअण्णा धोंडगे

Webdunia
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017 (13:06 IST)

सर्वत्र दुष्काळ, नापिकी, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतीमालाला कमी भाव यामुळे शेतकरी संकटात असून सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या रडारवर असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किसान सेलचे अध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी गुरुवारी लोहा पत्रकार परिषदेत केले.
 

शेतकरी, शेतमजूर आर्थिक अडचणीत येऊन कर्जाच्या मोठ्या विळख्यात सापडली आहेत. कर्जमाफीच्या कचाट्यातून शेतकरी वर्ग अजूनही सावरला नाही. त्यामुळे विनाअट शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी आज पर्यन्त झाली नाही. परिणामी फडणवीस सरकार असंवेदनशील असून सरकार शेतकऱ्यांच्या रडारवर असल्याचे प्रतिपादन शंकरअण्णा यांनी किसान मंच शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानांतर्गत लोहा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.
 

पुढे बोलताना ते म्हणाले की विदर्भातील शेतकऱ्यांची अत्यंत बिकट अवस्था असून छत्तीस कोटी रुपयाचे सोयाबीन अनुदान अजूनही सरकारने दिलेले नाही.

परिणामी सर्व शेतकऱ्यांनी संघटित होऊन सुलतानी संकटाचा सामना कारावा असे मत त्यांनी मांडले. यावेळी बाबासाहेब देशमुख, माजी जि. प. उपाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे, संजय पाटील कराळे, छत्रु महाराज, शिवराज पवार, बंटी सावंत, जीवन वडजे आदी मोठ्या संखेने उपस्थित होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

LIVE: वाळू माफियांवर सरकारची कारवाई, विशेष कृती दल स्थापन केले जाणार

केंद्र सरकारने 1 जुलै 2026 पासून पासपोर्ट शुल्कात लक्षणीय वाढ केली

मेक्सिकोचे दिग्गज गोलकीपर गुइलेर्मो ओचोआ यांनी व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्ती घेतली

नवीन टोयोटा हायलक्स 28 जुलै रोजी लॉन्च होण्यासाठी सज्ज

Nothing Phone (3) : AI वैशिष्ट्यांसह 'नथिंग'चा नवीन स्मार्टफोन; लीक झालेली किंमत, वैशिष्ट्ये जाणून घ्या

पुढील लेख
Show comments