Festival Posters

माथाडी कामगारांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार - शरद पवार

Webdunia
सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (16:40 IST)

स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त नवी मुंबई शहरात माथाडी कामगारांचा भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त माथाडी कामगारांच्या वतीने खासदार शरद पवार  यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , ज्येष्ठ नेते गणेश नाईक , आमदार नरेंद्र पाटील ,   संदीप नाईक, किरण पावसकर, महापौर सुधाकर सोनावणे, नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यात असुरक्षित कामगारांची संख्या वाढत चालली आहे ही गंभीर बाब आहे. सरकार कंत्राटी कामगारांना संरक्षण देत नाही, हे चांगले नाही, असे मत यावेळी पवार यांनी मांडले. आजच्या कार्यक्रमात काही कारणास्तव मुख्यमंत्री आले नाहीत पण आम्ही त्यांची स्वतंत्र वेळ घेऊन माथाडी कामगारांचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडू, असे आश्वासनही त्यांनी दिले. माथाडी कामगारांचे मुंबई उभारण्यात महत्त्वाचे योगदान आहे. मेहनतीने काम करतानाच भविष्याची चिंताही माथाडी कामगारांना असते. म्हणूनच या कामगारांचे प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले. आम्ही शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तो प्रयत्न करू. आदरणीय शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी एक बैठक झाली तर नक्कीच माथाडी कामगारांचे प्रश्न सुटतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

विनाहिजाब कॉन्सर्ट सादर केल्याबद्दल इराणी गायिकेला ७४ कोडे मारण्याची क्रूर शिक्षा!

मान्सून लांबणीवर! ७ राज्यांत पारा ४० पार; जाणून घ्या पाऊस कधी पडणार?

Reliance Industries दोन लाख हरित रोजगार निर्माण करेल, अनंत अंबानी यांची घोषणा; नवीन ऊर्जा व्यवसायाचा परिणाम रिलायन्सच्या कमाईमध्ये दिसून येईल

देशातील सर्वात मोठा संरक्षण अणु-अंतराळ कॉरिडॉर नागपूरच्या सावनेरमध्ये उभारला जाणार; सरकारने अधिसूचना जारी केली

मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा उपोषणाचा इशारा दिला

पुढील लेख
Show comments