Festival Posters

तीन चार दिवसात लोकसभा निवडणुक, सज्ज रहा – शरद पवार

Webdunia
मंगळवार, 5 मार्च 2019 (08:37 IST)
लोकसभा निवडणुकीचा  पूर्ण कार्यक्रम येणाऱ्या सात किंवा आठ रोजी जाहीर होण्याची दाट शक्यता असून, यामुळे आपण सर्वांनी आता निवडणुकांसाठी सज्ज रहावे लागेल असा  आदेशच  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. तर पुढील महिन्यात एप्रिलमधील  तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल, असं पवार यांनी अंदाज व्यक्त केला आहे.
 
चोपडा लॉन्स, गंगापूर रोड, नाशिक येथे नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, आ. हेमंत टकले, पंकज भुजबळ, नरहरी झिरवाळ, माजी आमदार जयवंतराव जाधव, डॉ.अपूर्व हिरे, जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड आदी उपस्थित होते.
 
शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की ,लोसासभा निवडणुकी तारखेला तुम्ही सकाळी साडेसहा वाजता मतदान केंद्रावर जाऊन मतदान यंत्राची पाहणी करुन जे बटन दाबले त्यालाच मतदान होतं की नाही याची खात्री करा, आमची निवडणूक यंत्रणेवर शंका नाही, मात्र केंद्र  व राज्य सरकारच्या भूमिकेवर शंका असल्याचं शरद पवारांनी सांगितले आहे.
 
मेळाव्यात शरद पवारांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राजकीय गरज भागविण्यासाठी भाजपने देशात जी आपत्ती आणली आहे ती घालविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर माझी शंका आहे त्यामुळे बूथ प्रमुखांनी सतर्क राहून काम करावे आणि सकाळी ती यंत्रे तपासून घेण्याची गरज आहे. कारण ज्यांचा हातात सत्ता आहे त्यांच सरकार हातातून जात असल्याने राडीचा डाव खेळणं हा भाजपचं प्रयत्न आहे. ज्या ठिकाणी भाजपची सत्ता होती ती राज्य भाजपच्या हातातून गेली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा परिवर्तन होणारच असे यावेळी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: सरकार ओबीसी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध

महाराष्ट्रात राज्यात ६.५ लाख कोटी रुपयांच्या अणुऊर्जा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली

अर्थसंकल्प वाचवण्यासाठी बुलेट ट्रेन आणि द्रुतगती मार्गांचे प्रकल्प थांबवण्याची रोहित पवार यांची मागणी

१९ वर्षीय नवविवाहितेच्या आर्त विनवणीकडे दुर्लक्ष झाले; दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला, नागपूर मधील घटना

भंडारा : साकोली तहसील परिसरात आग विझवण्याचा प्रयत्न करताना शेतकऱ्याचा जळून मृत्यू

पुढील लेख
Show comments