Dharma Sangrah

मी स्वतः २७ तारखेला ईडीच्या कार्यालयात जाणार: शरद पवार

Webdunia
शरद पवार यांना ईडी नोटिसीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलने केली आहेत. आता स्वतः शरद पवार पुढे आले आहेत, मुंबई: मी गुन्हा काय केले आहे, हे तरी मला समजू द्या असे म्हणत इ्रडीचा पाहूणचार स्वीकारण्यासाठी मीच शुक्रवारी (दि. २७) दुपारी इडी कार्यालयात जाणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे या प्रश्‍नावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.ईडीने माझ्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी म्हणजेच शिखर बॅंक प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात मी ईडीला पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका घेणार आहे. मात्र, मी नक्की गुन्हा काय केला ते तरी मला समजलं पाहिजे असेही पवार म्हणाले. पुढील महिनाभर मी निवडणूक प्रचारात व्यस्त असेन. मी मुंबईबाहेर राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी दोन वाजता ईडीच्याकार्यालयात मी स्वतःहूनच जाणार आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना माझ्याबाबत जी माहिती हवी असेल ती देईन. त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर माझा पूर्ण विश्वास आहे असेही त्यांनी सांगितले.
 
मी राज्य सहकारी बॅंकेचा कधीही संचालक वा सदस्य कधीच नव्हतो. मी महिनाभर राज्यात निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार आहे, त्यामुळे ईडीला माझी गरज लागली तर नी एकदम अदृष्य झालो असे वाटू नये म्हणून मीच ईडीच्या मुंबईतील कार्यालयात दाखल होणार असल्याचे पवारांनी सांगितले.‘दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकणार नाही, आमच्यावर शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत. मी संविधान मानणारा आहे,’ असं शरद पवार म्हणाले. आता संपूर्ण महिना निवडणूक प्रचारासाठी वेळ देणार आहे, त्यामुळे मी मुंबईबाहेर राहणार आहे. ईडीला मला काही प्रेमाचा संदेश पाठवायचा असेल आणि मी उपलब्ध नाही, असं व्हायला नको, म्हणून मी ईडीच्या ऑफिसमध्ये जाणार असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं.‘माझ्या आयुष्यातील गुन्हा दाखल व्हायचा हा दुसरा प्रसंग आहे. याआधी १९८० साली शेतकरी प्रश्नावर दिंडी काढली होती तेव्हा जळगावमध्ये माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता,’ ही आठवण पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

विनाहिजाब कॉन्सर्ट सादर केल्याबद्दल इराणी गायिकेला ७४ कोडे मारण्याची क्रूर शिक्षा!

मान्सून लांबणीवर! ७ राज्यांत पारा ४० पार; जाणून घ्या पाऊस कधी पडणार?

Reliance Industries दोन लाख हरित रोजगार निर्माण करेल, अनंत अंबानी यांची घोषणा; नवीन ऊर्जा व्यवसायाचा परिणाम रिलायन्सच्या कमाईमध्ये दिसून येईल

देशातील सर्वात मोठा संरक्षण अणु-अंतराळ कॉरिडॉर नागपूरच्या सावनेरमध्ये उभारला जाणार; सरकारने अधिसूचना जारी केली

मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा उपोषणाचा इशारा दिला

पुढील लेख
Show comments