Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवार यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

Webdunia
मंगळवार, 29 जून 2021 (22:30 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (29 जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'वर्षा' बंगल्यावर भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तासांहून अधिक काळ चर्चा झाली.
 
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते.
 
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
 
मंगळवारी (29 जून) मनी लाँडरिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आलं आहे.
 
शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी (28 जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी लगेचच शरद पवार यांची ' सिल्व्हर ओक' या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.
 
मुंबई शहरात कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवासाची सोय करण्यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयाला 100 सदनिका हस्तांतरित करण्याच्या म्हाडाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली होती. अर्थात, त्यानंतर पर्यायी जागा देत यावर तोडगाही काढण्यात आला.
या सर्व भेटीगाठी आणि घडामोडींमुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असावी, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांसोबतची आपली बैठक ही बीडीडी चाळीसंदर्भात होती, असं सांगितलं आहे.
 
या भेटीबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे यांनी म्हटलं की, गेल्या काही दिवसात महाविकास आघाडीमध्ये नाराजीचा सूर होता. प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रम होता. म्हाडाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी दिलेली स्थगिती यामुळे नाराजी होती. त्यासोबत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने आघाडीत संभ्रमाचं वातावरण होतं. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी संजय राऊत मुख्यमंत्री आणि शरद पवारांना भेटले. आजही महाविकास आघाडीच्या विविध मुद्यांवर पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली असावी.
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

मुंबई पोलिसांच्या गुप्तचर विभागाची शक्ती वाढणार, सहआयुक्ताची नियुक्ती होणार

LIVE: हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव यांची भेट घेतली

सोलापूर-पुणे महामार्गावर दोन ट्रकची भीषण टक्कर

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव यांची भेट घेतली

सुरक्षा दलांना मोठे यश, लष्करच्या ३ दहशतवादी साथीदारांना अटक

पुढील लेख
Show comments