Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवारांचा सचिन तेंडुलकरला सल्ला, आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्या

Webdunia
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (22:32 IST)
भारताचा सर्वोत्तम क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ते लता मंगेशकर यांनी शेतकरी आंदोलनावर सरकारला अनुकूल ठरणारी भूमिका घेतली. त्यावर, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्यावेळी शरद पवारांनी सचिन तेंडुलकरला एक सल्ला दिला.
 
“लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरांच्या प्रतिक्रियांवर अनेक सामान्य लोक तीव्र पणे होत आहेत. आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी असा माझा सचिनला सल्ला राहील.” असे शरद पवार म्हणाले.
 
“इतके दिवस कष्टकरी वर्ग रस्त्यावर बसला आहे. त्याचा विचार करायला पाहिजे. त्याचाच प्रतिसाद आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. सहानुभूती मिळते. हे खरं तर चांगलं नाही. आपले पंतप्रधान तिकडे बोलले होते. आता त्यांची प्रतिक्रिया येत आहे. शेतकऱ्यांना कधी खलिस्तानी म्हणतात कधी अतिरेकी म्हणतात. शेतकरी आंदोलनाला बदनाम करत आहेत” असे शरद पवार म्हणाले.
 
“शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. वरिष्ठ मंत्र्यांनी पंतप्रधान, संरक्षणमंत्री, गडकरी सारख्या नेत्यांनी पुढाकार घेतला, तर मार्ग निघण्याची शक्यता आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांचा अनादर करण्याचा हेतू नाही” असे शरद पवारांनी सांगितले. “सर्वोच्च स्तरावर जर प्रयत्न केला, तर शेतकरी नेत्यांनी सुद्धा चर्चा करावी. स्वातंत्र्यानंतर कधी असं घडलं नाही. सरकारने ही टोकाची भूमिका घेतल्यावरुन त्यांचे धोरण स्पष्ट होत आहे. अन्नदाता जर रस्त्यावर बसतो. तर त्याला प्रतिसाद दिला पाहिजे” असे शरद पवार म्हणाले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: उबर चालका कडून 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग

उबर चालका कडून 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

पाकिस्तानच्या गोळीबारामुळे उरी एका भुताच्या शहरात रूपांतरित झाले

महाराष्ट्र-गुजरातमध्ये वादळाचा इशारा Weather Update

अहिल्यानगरच्या श्रीरामपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत 14कोटी किमतीचे ड्रग्ज जप्त केले

पुढील लेख
Show comments