Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धक्कादायक! एसपीयू जवानाची गोळी झाडून आत्महत्या

Webdunia
शनिवार, 3 जुलै 2021 (19:05 IST)
नागपुरातील एसपीयू जवानाने कोरोना नंतर ब्लॅक फंगसमुळे आपला डोळा गमावला त्या नैराश्यात येऊन स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.
 
ही हृदय विदारक घटना आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास नागपुरातील झिंगाबाई टाकळातील निवारा नावाच्या हौसिंग सोसायटी मध्ये घडली असून प्रमोद शंकरराव मेरगूवार असे मयत चे  नाव आहे. 
 
प्रमोद हे मूळ ग्रामीण पोलीस दलामध्ये कार्यरत असून प्रतिनियुक्तीवर एसपीयू मध्ये सामील झाले.त्यांना कोरोनाची लागण झाली होती.नंतर त्यातून ते बरे झाले आणि त्यांना ब्लॅक फंगस झाला त्यामुळे त्यांना डोळ्याला त्रास होऊ लागला.सुरुवातीस त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले नंतर त्यांना पुढील उपचारासाठी हैदराबाद पाठविण्यात आले.या उपचारा दरम्यान त्यांचा एक डोळा निकामी झाला.त्यामुळे ते तणावाखाली गेले.याच दरम्यान त्यांच्या दुसऱ्या डोळ्याला देखील त्रास होत होता. वेदना असह्य झाल्यामुळे आणि तणावाखाली येऊन त्यांनी आज दुपारी स्वतःवर बंदुकाने गोळी झाडून  आत्महत्या करून आपले जीवन संपविले.या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
 
घटने ची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठविले.पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून तपास सुरु आहे. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईच्या प्रतिष्ठित एअर इंडिया बिल्डिंगमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचे नवीन कार्यालय असणार

UNESCO च्या जागतिक वारसा यादीत २५ नवीन स्थळांचा समावेश, ज्यात एका प्रसिद्ध भारतीय स्थळाचाही समावेश

१ ऑगस्टपासून तत्काळ तिकीट बुक करण्याची प्रक्रिया बदलणार! प्रवास करण्यापूर्वी नवीन नियमांविषयी जाणून घ्या....

दुसऱ्यांच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकतो का?

नागपूर मध्य भारताचे रेल्वे केंद्र बनले, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत माहिती दिली

पुढील लेख
Show comments