Dharma Sangrah

...तर शरद पवार पंतप्रधान झाले असते

Webdunia
गुरूवार, 8 फेब्रुवारी 2018 (11:16 IST)
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेस सोडली नसती तर ते पंतप्रधान झाले असते. कारण त्यावेळी त्यांच्या तोडीचा दुसरा अन्य नेता कोणीही नव्हता, असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुार शिंदे यांनी सांगितले.
 
शरद पवार हे आपले गुरू तर आहेतच शिवाय ते अतिशय चलाख नेते आहेत. त्यांना भविष्यातील सर्व काही उमजते. असा गुरू मला लाभला हे माझे भाग्य समजतो, असेही शिंदे म्हणाले. 
 
शिंदे यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारताना विविध मुद्द्यांना स्पर्श केला. यापूर्वी दोनवेळा भाजपचे सरकार सत्तेवर आले; परंतु ज्या पध्दतीने त्यांनी काम केले, ते काम जनतेला रुचले नाही. त्यामुळे शेवटी नाईलाजाने त्यांना पाउतार व्हावे लागले. त्यावेळी शायनिंग इंडियाचा जोरात प्रचार झाला होता. आताही त्याप्राणेच स्टॅन्डअप आणि स्टार्टअप इंडियाचा प्रचार सुरू आहे. केवळ या सरकारकडून घोषणाबाजी सुरू आहे अंलबजावणी मात्र शून्य आहे. त्यामुळळे हे सरकार आता सीटडाउन झाले असून लवकरच ते स्लीपडाउन होईल, अशी स्थिती असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण जवळून पाहिले आहे. ते गुजरातचे मुख्यमंत्री आणि हिमाचल प्रदेशचे पक्षाचे प्रभारी असताना त्यांची माझी नेहमीच भेट व्हायची. मात्र, ते चहा विकत होते, असे कधी ऐकणत आले नाही. ते आताच चहावाले कसे काय झाले? आता त्यांच्या लोकांसाठी तरी त्यांनी काही करून दाखवावे, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली

ट्रम्प यांचा यू-टर्न! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपवण्याचे संकेत दिले

Ashok Kharat case "मग राजकारण्यांना बुरखा घालून फिरावे लागेल," मंत्री संजय शिरसाट म्हणाले.....

कतारच्या रास लफानवरील इराणी हल्ल्यामुळे जगातील तंत्रज्ञान आणि आरोग्य उद्योग ठप्प होतील का? MRI महाग होतील तर एआय चिप्स वर मोठे संकट

रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली

पुढील लेख
Show comments