rashifal-2026

कार्यकर्त्यांनी मंत्र्यांच्या गाडीसमोर ओतली सोयाबीनची पोती

Webdunia
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017 (16:10 IST)

किचकट शासकीय प्रक्रियेमुळे सोयाबीन हमी केंद्रावर पडून, योग्य दर मिळण्याची केली मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीनची पोती ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे पालकमंत्री विजय शिवतारे आणि मंत्री महादेव जानकर यांच्या गाड्या अडवल्या. सोयाबीनला योग्य दर मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सरकारकडून या प्रकरणी दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी  केला.

सोयाबीन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने मुक्काम ठोकल्यामुळे पिकाचे नुकसान झाले. त्यातून जगलेले काही पीक हे आता सरकारी कचाट्यात अडकले आहे. सातबारा उताऱ्यावर सोयाबीनची नोंद असेल तरच खरेदी केंद्रावर नोंदणी होऊ शकेल असा फतवा काढण्यात आला असल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.

सोयाबीनसाठी क्विंटलला ३ हजार ५० रुपये दर आधारभूत निश्चित करण्यात आला आहे. या दराने विक्री करण्यासाठी शेतकऱ्याला बाजार समितीच्या हमी भाव खरेदी केंद्रावर नोंदणी करावी लागत आहे. काही शेतकरी ऊसात सोयाबीन हे आंतरपीक घेतात. मात्र, आंतरपिकाची नोंद केली जात नाही. सातबारा उताऱ्यावर केवळ ऊसच दिसत असून सोयाबीन नाही. रानात सोयाबीनची पेरणी खरीप हंगामात मोठया प्रमाणात होते. मात्र, सातबारा उताऱ्यावर खरीप आणि रब्बी असा स्वतंत्र कॉलमच नाही. ऑनलाईन खरेदी केंद्रावर नोंदणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

LIVE: फडणवीस सरकारने धर्म स्वातंत्र्य कायदा २०२६ मंजूर केला

कोल्हापूर विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक अशोक खरात प्रकरणावर मौन सोडले, कोणालाही सोडले जाणार नाही म्हणाले

कतारमध्ये हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देशातील सर्वाधिक काळ पदावर राहिलेले नेते बनले, पवन चामलिंग यांना मागे टाकले

पुढील लेख
Show comments