Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एसटीचे नियोजन पूर्ण, गावी जाता येणार

Webdunia
रविवार, 10 मे 2020 (10:04 IST)
राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अनेक मजूर, विद्यार्थी आणि इतर लोक अडकून पडले आहेत. त्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या सर्वांना गावी जाण्यासाठी २२ जणांची यादी करावी लागणार आहे. ही यादी शहरातील लोकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी, तर गावातील लोकांनी ही यादी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांकडे सोपवावी. त्यात त्यांचा मोबाईल नंबर, आधारकार्ड नंबर, जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी जायचे ते याची सर्व माहिती नोंदवावी लागणार आहे. त्यानंतर २२ जणांचा ग्रुप झाल्यानंतर पोलीस किंवा जिल्हाधिकारी त्यांना बस सुटण्याचे ठिकाण आणि वेळ सांगतिल. तसेच प्रत्येकांनी आपल्या खाण्यापिण्याची स्वत:च व्यवस्था करावी. मात्र, गावी जाण्यासाठी कोणतेही भाडे आकारले जाणार नाही, असेही परब यांनी सांगितले आहे. राज्यातील कोणत्याही रेड झोन कंटेन्मेंट झोनमधील कोणत्याही व्यक्तीला प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही.
 
एका एसटीतून केवळ २२ प्रवाशांना जाता येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक सीटवर एका व्यक्तीला बसण्याची सोय केली जाणार आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्ती तोंडाला मास्क लावणार अशांनाच प्रवेश दिला जाणार आहे. मोफत जाण्यास मिळत आहे म्हणून कोणीही पोलीस ठाण्यात किंवा तहसील कार्यालयात विनाकारण गर्दी करु नये. त्याचप्रमाणे गावाकडे पोहोचल्यानंतर या प्रवाशांची तपासणी करायची की नाही याचा निर्णय संबंधित नोडल अधिकारीच घेतील, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईतील इलेक्ट्रॉनिक शोरूममध्ये भीषण आग

कामगार दिनाच्या शुभेच्छा Labour Day 2025 Wishes In Marathi

कॅनडामध्ये चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भारतीय विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला, हत्येचा संशय

ठाण्यात लाच घेताना तलाठीच्या विरुद्ध एसीबी कडून गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments