Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तरीही त्र्यंबकेश्वरला दिंड्या दाखल

Webdunia
शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (08:13 IST)
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भरणारी पौषवारी शासनाने रद्द केली असली तरी राज्यभरातून दिंड्या त्र्यंबकेश्वरला दाखल होत २८ जानेवारी रोजी होणा-या वारी पूर्वीच १५ दिवस अगोदर दिंडया येत आहेत. नगर, ठाणे, जळगाव, औरंगाबाद, पुणे यासह नाशिक जिल्ह्यातून दरवर्षी पायी दिंडीने किमान दोन लाख वारकरी पायी येत असतात. जवळपास ५०० ते ६०० दिंडयांची नोंद होत असते. यावर्षी कोविडच्या कारणाने वारी रद्द झाली. मात्र वारकरी भाविक पाच दहाच्या जथ्याने पायी येत आहेत. एक दिवस मुक्काम करून पुन्हा परतीचा प्रवासाला सुरूवात करत आहेत. सोबत विणा झेंडे यासह पालखी ठेवलेले रथ देखील दिसून येतात. नाथांच्या मंदिरात फुगडया घालत अभंग म्हणत आपली सेवा रूजू करतात. वारी बंद असेल म्हणून काय झाले त्र्यंबकेश्वर येथील प्रत्येक दिवस वारीचाच आहे.नाथांच्या समाधी दर्शनाने कृतार्थ होत आहोत. ब्रह्मगिरीच्या दर्शनाने आणि कुशावर्तातील गोदामायीच्या स्पर्शाने गहीवरून येत असल्याच्या भावना वारकरी व्यक्त करतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments