Festival Posters

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडून २० हजार कोटींचा भ्रष्टाचार

Webdunia
गुरूवार, 10 ऑगस्ट 2017 (09:00 IST)
4

एमआयडीसीची १२ हजार हेक्टर जमीन भूसंपादनातून वगळून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडून २० हजार कोटींचा भ्रष्टाचार गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता  व उद्योग मंत्री सुभाष देसाई  यांना मंत्रीपदावून हटवल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही

राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रीपदाच्या कार्यकाळात एमआयडीसाठीची १२ हजार हेक्टर जमीन भूसंपादनातून वगळून बिल्डर व भूमाफियांना २० हजार कोटींचा लाभ मिळवून देत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी आज सभागृहात केला. या भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत देसाई यांना मंत्रीपदावरुन हटवावे, अशी मागणी मुंडे यांनी केली. भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप असलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना मंत्रीपदावरुन हटवल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू न देण्याचा निर्धार मुंडे यांनी व्यक्त केला.

विधान परिषदेत नियम २८९ अन्वये हा मुद्दा उपस्थित करताना मुंडे यांनी उद्योगमंत्र्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. मुंडे म्हणाले की एमआयडीसीसाठीची जमीन भूसंपादनातून वगळण्यास उद्योग विभागाने सातत्याने विरोध करुनही मंत्री देसाई यांनी विभागाचे मत व विरोध डावलला व सुमारे १२ हजार हेक्टर जमीन वगळण्याचा निर्णय घेतला. मंत्री सुभाष देसाई यांनी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादनातून वगळल्या त्या शेतकऱ्यांच्या यादीत हजारो कोटींची उलाढाल करणाऱ्या नाहर डेव्हलपर्सचे चेअरमन अभय नाहर, स्वस्तिक प्रॉपर्टीज्‌चे संचालक कमलेश वाघरेचा, राजेश वाघरेचा, राजेश मेहता अशा अनेक बिल्डर्सची नावे असल्याची वस्तुस्थितीही मुंडे यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिली.

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

T20 World Cup पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला; आयसीसीच्या नियमांचे पालन करीत टीम इंडिया श्रीलंकेला जाणार

बीडमध्ये अपघातात शिवसेना नेत्याचा मृत्यू

जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्लाला भूकंपाचा धक्का

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून भाजप नेत्याची ४६ लाख रुपयांची फसवणूक

आदित्य ठाकरे यांनी २०२६ च्या अर्थसंकल्पावर हल्लाबोल केला, सर्वाधिक कर भरणारे राज्य सर्वात दुर्लक्षित असल्याचे म्हटले

पुढील लेख
Show comments