Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साखर कारखान्याच्या अधिकाऱ्याचा मारहाणीत मृत्यू; सहसंचालकासह 6 जणांना अटक

Webdunia
शनिवार, 13 मार्च 2021 (08:51 IST)
सातारा जिल्ह्यात पडळ येथील खटाव माण साखर कारखान्यातील अधिकाऱ्याचा मारहाणीत मृत्यू झाला आहे. साखर कारखान्यातील साखरेची अफरातफर केल्याचा आरोपातून हा प्रकार घडला. या प्रकरणी माजी आमदारासह 19 जणांवर 302 कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचं देखील नाव आहे.
 
पडळ येथील के. एम. शुगर कारखान्यांमध्ये प्रोसेसिंग हेड म्हणून कार्यरत असणाऱ्या जगदीप थोरात या अधिकाऱ्याला 10 मार्चला कारखान्यात साखरेची अफरातफर केल्याच्या आरोपावरून मारहाण करण्यात आली होती. यानंतर जगदीप थोरात यांना 11 मार्चला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्रास होऊ लागला. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
 
जगदीप थोरात असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. थोरात हे पडळ येथील के. एम. शुगर कारखान्यामध्ये प्रोसेसिंग हेड म्हणून कार्य़रत होते. 10 मार्च रोजी थोरात यांच्यावर साखरेच्या अफरातफरीचा आरोप करण्यात आला. या आरोपावरून थोरात यांना कारखान्यात बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर थोरात यांना 11 मार्च रोजी पहाटे त्रास होऊ लागल्याने कुटुंबाने त्यांना तातडीने कराड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान जगदीप थोरात यांचा मृत्यू झाला.
 
या प्रकरणी कराड शहर पोलिसांनी अकस्मिक मृत्यू नोंद केली. मात्र, थोरात यांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर पोलिसांनी थोरात यांच्या कुटुंबाच्या तक्रारीनुसार कारखान्याचे संचालक आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, सहसंचालक मनोज घोरपडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संग्राम घोरपडे आणि त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांवर वडूज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सहसंचालक मनोज घोरपडे यांच्यासह सहा जाणांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments