Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

समाजसेवा करणाऱ्यांना पाठबळ देणे माझा राजधर्म- राजे समरजितसिंह घाटगे

Webdunia
सोमवार, 28 ऑगस्ट 2023 (08:00 IST)
Raje Samarjitsinh Ghatge
छत्रपती शाहू महाराज यांच्या राजाश्रयामुळे त्या काळात कुस्ती कलेने सुवर्णकाळ अनुभवला. त्यांच्या पश्चात अवकाळा आलेल्या कुस्ती कलेस स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी दिलेल्या पाठबळामुळे चालना मिळाली. त्यांचा हाच विचार वस्ताद जयवंत पाटील यांनी आपल्या परीने जपून प्रत्यक्ष कृतीतून त्यांना अभिवादन केले आहे.लाल मातीच्या सेवेचा त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. निःस्वार्थीपणे समाजसेवा करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे राहून त्यांना पाठबळ देणे हा माझा राजधर्मच आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
 
उचगाव ता. करवीर येथील बजरंग आखाड्याचे वस्ताद जयवंत पाटील यांनी राहत्या घरी बालमल्लांसाठी स्वखर्चातून आखाडा उभारून मोफत चालवित असल्याबद्दल त्यांच्या सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रौढांच्या धावण्याच्या स्पर्धेतील यशाबद्दल त्यांच्या पत्नी सौ.अनिता पाटील यांचाही सत्कार केला.
 
पुढे बोलताना समरजीतसिंह घाटगे म्हणाले, “छत्रपती शाहू महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी आयुष्यभर शेतकरी, कामगार, खेळाडू, कलाकार यांच्यासाठी काम केले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन बजरंग आखाड्याच्या माध्यमातून बालमल्लांना मोफत कुस्तीचे धडे देऊन वस्ताद जयवंत पाटील यांनी चांगुलपणा जोपासला आहे.” असे मत व्यक्त केले.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

ठाण्यात शेजाऱ्याच्या पत्नीवर मुलीसमोर बलात्कार, आरोपीला अटक

ठाण्यातील व्यावसायिकाची 1.27 कोटी रुपयांची फसवणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान जगन्नाथाची मूर्ती डिजिटल पेमेंटद्वारे खरेदी केली, व्हिडीओ व्हायरल

Tirupati Laddu Case:तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादात भेसळ,सीएम चंद्राबाबू नायडूंचं मोठं वक्तव्य, म्हणाले- 'कोणालाही सोडणार नाही

काँग्रेस परदेशी भूमीवर भारताचा अपमान करते,पंतप्रधान मोदी वर्ध्यात म्हणाले

पुढील लेख
Show comments