Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लोकांमधला सामाजिक धाक कमी झाला आहे - सुप्रिया सुळे

Webdunia
दिवसेंदिवस राज्यात छेडछाडीचे प्रमाण वाढत आहे. दिल्लीच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका लहान मुलाची हत्या करण्यात आली. लोकांमधला सामाजिक धाक कमी झाला असल्यामुळेच अशा प्रकारांमध्ये वाढ होत आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे  यांनी व्यक्त केले. जागर युवा संवाद यात्रेनिमित्त इस्लामपूर येथे असताना त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
 
पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की पूर्वी महिलांवरील अत्याचाराच्या घटना फार कमी ऐकायला मिळायच्या. आज रोज अशा घटना ऐकायला मिळतात. मुलांसाठी शाळांमध्ये असुरक्षित वातावरण तयार झाले आहे. समाज म्हणून हे आपले अपयश आहे. आपण सर्वांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असेही त्या म्हणाल्या. सरकारच्या कारभारावर टीका करत सुळे म्हणाल्या की सरकारचा विकासाचा एजेंडा बाजूला राहिला आहे. विकासाचा मुद्दा बाजूला ठेवत हे सरकार वेगळ्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहे. या सरकारच्या पारदर्शकतेचे काय झाले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ऐन दिवाळीत या सरकारने गरीबांच्या तोंडची साखर पळवली. या सरकारच्या काळात सर्वच घटक निराश आहे अशी टीका खासदार सुळे यांनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments