Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रायगड विषबाधा प्रकरण: सावळ्या रंगामुळे त्रस्त महिलेने महाप्रसादात टाकलं होतं किटकनाशक

Webdunia
शनिवार, 23 जून 2018 (15:28 IST)
रायगड जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या महड विषबाधा प्रकरणाच्या पोलीस तपासाला अखेर यश आले आहे. महड विषबाधामध्ये एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. महड गावात राहणाऱ्या सुभाष माने यांच्या नूतन घराची वास्तुशांतीच्या कार्यक्रमातीळ महाप्रसाद जेवणातून विषबाधा झाली होती. या घटनेचा तपास खालापूर पोलीस करीत होते. खालापूर पोलिसांच्या एकूण चार तपास पथके याचा तपास करत होते. संपूर्ण रायगड जिल्ह्याला या घटनेने खळबळ उडवून दिली होती. चार लहान मुले आणि एक पुरुष असे एकूण पाच जणांचा या विषबाधेत मृत्यू झाला होता.
 
महड विषबाधा तपासाला खालापूर पोलिसांना यश आले आहे. सुभाष माने यांच्या घरा शेजारी राहणाऱ्या एका महिलेने सुभाष माने यांच्या घरी वास्तूशांतीच्या वेळी बनवलेल्या महाप्रसाददाच्या जेवणातील पदार्थामध्ये कीटकनाशक टाकले होते. ज्या महिलेने हे निर्दयी कृत्य केले त्या महिलेला खालापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी महिले सोबत सुभाष माने या कुटुंबाचे काही दिवसापूर्वी भांडण झाल्याची माहिती समोर येते आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments