Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा आजपासून सुरु

Webdunia
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020 (10:21 IST)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलंबाने होत असलेल्या दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा आजपासून सुरु होत आहे. दहावीची परीक्षा ५ डिसेंबरपर्यंत तर बारावीची परीक्षा १० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. दहावीसाठी १३ हजार तर बारावीसाठी २२ हजार विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे.
 
महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण विभागीय मंडळातर्फे दहावी आणि बारावीची फेरपरीक्षा २० नोव्हेंबरपासून घेण्यात येणार आहेत. फेब्रुवारी-मार्च २०२० च्या परीक्षेत उत्तीर्ण न झालेले व एटीकेटीसाठी पात्र विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. मुंबईतून या परीक्षेसाठी दहावीसाठी १३ हजार तर बारावीसाठी २२ हजार विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना विद्यार्थी व पालकांना येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी मुंबई विभागातर्फे विशेष हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. परीक्षांच्या काळात जे विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक तणाव व दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराशातून बाहेर काढण्यासाठी तसेच विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशकांनी नियुक्ती मुंबई विभागीय मंडळातर्फे करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तान घाबरला,फटाके आणि लाऊडस्पीकरवर बंदी

पहलगाम हल्ल्याच्या तपासासाठी एनआयए 3D मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करणार, काय आहे हे

LIVE: नागपुरात हवामान खात्याकडून पावसाचा यलो अलर्ट जारी

नागपुरात जोरदार पावसासह गारपीटामुळे जनजीवन विस्कळीत यलो अलर्ट जारी

मुंबईच्या 'या' प्रसिद्ध खेळाडूवर बलात्काराचा आरोप

पुढील लेख
Show comments