Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना चाचणी प्रवासाहून आल्यानंतर सातव्या दिवशीच करण्यात येणार

The corona test
Webdunia
सोमवार, 28 डिसेंबर 2020 (08:45 IST)
ब्रिटन, युरोप आणि आखातातून आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात (क्वारंटाईन) राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यांची कोरोना चाचणी प्रवासाहून आल्यानंतर सातव्या दिवशीच करण्यात येणार असल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी ही चाचणी पाचव्या किंवा सातव्या दिवशी करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. मात्र पालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत.
 
ब्रिटन, लंडनहून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे राज्यातही नव्या कोरोनाची भीती आहे. त्यामुळे मुंबई पालिका आयुक्तांनी खबरदारी म्हणून आता सात दिवसानंतर कोरोना टेस्ट बंधनकारक केली आहे. ब्रिटनहून  परतलेल्या २१ प्रवाशांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतात पुन्हा भीतीचे सावट निर्माण झाले आहे. मुंबईत एकही प्रवासी पॉझिटिव्ह नसला तरी महिनाभरात ब्रिटनहून परतलेल्या सगळ्या प्रवाशांची होणार कोरोना टेस्ट होणार आहे.
 
मुंबईत रविवारपासून ब्रिटनहून तब्बल ५९१ पेक्षा जास्त नागरिक परतले आहेत. मात्र आतापर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला नसल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. या प्रवाशांमध्ये मुंबईतील १८७ आणि  राज्यातील १६७ तर परराज्यातल्या २३६ प्रवाशांचा समावेश आहे. यातील २९९ जणांना हॉटेलमध्ये पाठवण्यात आले आहे. तर इतर राज्यांतील प्रवासी दुसऱ्या विमानाने आपापल्या राज्यात परतले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गुरुचरित्र विषयी महत्त्वाची माहिती

Vat Savitri Vrat 2025 वट सावित्री व्रत कधी आहे, जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि विधी

आरोग्यवर्धक सीताफळची पाने रक्ताची कमतरता दूर करून हाडे मजबूत करते

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणती डाळ खाणे सर्वात योग्य ठरेल?

Things to Avoid in Kitchen तुमच्या स्वयंपाकघरात या वस्तू तर नाही? असतील तर लगेच बाहेर काढा

सर्व पहा

नवीन

गडचिरोली जिल्ह्यातील छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत चार माओवादी ठार

'आप' नेत्याच्या वैवाहिक जीवनावर केलेल्या टिप्पणीबद्दल कोर्टाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना नोटीस पाठवली

LIVE: उद्धव आणि राज ठाकरे युतीच्या अटकळवर मनसेने प्रतिक्रिया दिली

"ईडी हे भाजप, मोदी आणि अमित शहा यांचे शस्त्र आहे" म्हणाले संजय राऊत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी ऑपरेशन सिंदूरबाबत एक मोठे विधान केले

पुढील लेख
Show comments