Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Cyclone Fengal चा परिणाम महाराष्ट्रावरही दिसणार, या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

Webdunia
शनिवार, 30 नोव्हेंबर 2024 (08:49 IST)
Maharashtra News: दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचे क्षेत्र शुक्रवारी दुपारी 2.30 च्या सुमारास चक्री वादळात रूपांतरित झाले आहे. तसेच तामिळनाडू व्यतिरिक्त, आंध्र प्रदेश, केरळ, पुद्दुचेरीसह जवळपासच्या राज्यांमध्येही चक्रीवादळ प्रभाव दिसून येईल.
 
मिळालेल्या माहितीनुसार फेंगल चक्रीवादळ आज संध्याकाळी तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता असून संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर दक्षिणेकडील राज्याच्या विविध भागांसाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. IMD च्या चक्रीवादळ विभागाचे प्रमुख यांच्या म्हणण्यानुसार, आज संध्याकाळपर्यंत हे चक्रीवादळ तामिळनाडू किनारपट्टीपासून 300-350 किमी अंतरावर होते. तसेच तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेश, केरळ आणि अंतर्गत कर्नाटकातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले की उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल आणि 30 नोव्हेंबर रोजी तामिळनाडूच्या अंतर्गत भागात मुसळधार पाऊस पडेल.
 
तर 6 डिसेंबर रोजी सांगलीसह सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने यापूर्वी वर्तविलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रुपांतरित झाल्यास महाराष्ट्र राज्यात त्याचा परिणाम कमी होईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

LIVE: रामदास आठवले म्हणाले भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

बुलढाणा जिल्ह्यातील धमक्यांना कंटाळून प्रियकराने केली आत्महत्या... तीन वर्षांच्या प्रेमकथेचा दुःखद अंत!

पालघरमध्ये भीषण अपघातात बहीण-भावाचा मृत्यू

१२ वर्षांनंतर मिळाला अल्पवयीन मुलीला न्याय, बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयाने आरोपीला ठोठावली शिक्षा

पुढील लेख
Show comments