Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतकऱ्याला भाव मिळाला नाही , 200 क्विंटल कांदा मोफत वाटला

Webdunia
सोमवार, 16 मे 2022 (10:56 IST)
शेतकऱ्याला राजा म्हणतात ह्याचे प्रत्यय आज पाहायला मिळाले बुलढाण्यात एका शेतकऱ्याने आपल्या उदारतेचा परिचय दिले आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने आणि उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेगावच्या गणेश पिंपळे नावाच्या शेतकऱ्याने हतबल होऊन आपला 200 क्विंटल कांदा अक्षरश: लोकांना फुकट वाटला. लोकांनी देखील मोफतचा कांदा घेण्यासाठी गर्दी केली होती. 
 
शेतकरी हा कष्ट करून आपल्या पिकाची जोपासना करतो. त्याला पीक वाढवण्यासाठी अस्मानी संकटाना समोरी जावे लागते.पीक वाढविण्यासाठी वर्षभर राबतो. त्याला अनेक अडचणींना सामोरी जावे लागते. तरीही सर्व संकटाना मात करून तो आपला तयार झालेला माल बाजारात विकण्यासाठी घेऊन जातो. पण जर त्या मालाला कवडी मोल किंमत मिळाल्यावर त्याच्या समोर काहीच पर्याय नसतो. तरीही त्याला बळीराजा किंवा शेतकरी राजा म्हणतात.

शेगावच्या एका शेतकरी राजाने आपल्या उदारतेच परिचय दिले आहे. गणेश पिंपळे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. गणेश यांनी आपल्या दोन एकरच्या शेतात कांद्याचं पीक लावले त्यात त्यांना सुमारे दोन लाख रुपयांचा खर्च झाला. पीक देखील तयार झालं. आता या पिकाला चांगला भाव मिळणार अशा आशेने ते बाजारात माल विकायला घेऊन गेले. मात्र कांद्याला घेण्यासाठी कोणीच व्यापारी तयार झाले नाही. हवा तसा भाव कांद्याला मिळाला नाही त्यामुळे कांदा खराब होऊन वाया जाऊ नये. या साठी  शेतकऱ्याने आपल्या घराच्या जवळच्या लोकांना कांदे फुकट दिले आणि कांदा फुकटात घेऊन जा असे नागरिकांना आवाहन केले. मोफत मिळणाऱ्या कांदा घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली क्षणातच 200 क्विंटल कांदा मोफत वाटला. आता गणेश यांचे तब्बल अडीच लाखांचा नुकसान झालं असून ते कर्जबाजारी झाले आहे. पुढे काय करावं हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

अतिशी ने दिल्लीच्या नववे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

तरुणांना सरकार दरमहा 1000 रुपये देणार, कोणत्य राज्यातील काय आहे योजना, कसा मिळणार लाभ?

नेहमी आपल्या बॅगेत कंडोम ठेवायची ! या महिला गव्हर्नरचे 58 कर्मचाऱ्यांशी संबंध होते

धारावीतील बेकायदा मशिदीचे बांधकाम हटवण्यासाठी गेलेले बीएमसीचे पथक परतले, मुदत वाढवली

मुंबईतील नालासोपारा रेल्वे स्थानकावर तिकीट मागितल्यावर टीसीला हॉकी स्टिकने मारहाण

पुढील लेख
Show comments