Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, कोकणात जोरदार पावसाचा इशारा दिला

Webdunia
सोमवार, 26 ऑगस्ट 2024 (14:32 IST)
सध्या राज्यात कमी दाब क्षेत्रामुळे मान्सून सक्रिय झाल्यामुळे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरित तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 
उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे रविवारी नव्याने कमी दाब क्षेत्रांची निर्मिती झाली.या मुळे पश्चिम बंगाल, ओडिसा कडे सरकणाऱ्या या प्रणालीची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

आज कोकण घाटमाथ्यासह राज्यात पावसाची दमदार हजेरी लागण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, ठाणे, रत्नागिरी, नंदुरबार, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, सातारा, आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

उर्वरित उत्तर महाराष्ट्र, कोकण भागात जोरदार मेघसरी बरसणार आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानसह ऊन-सावली असून पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता हवामान खात्यानं केली आहे. 

हवामान विभागाने पालघर धुळे, मुंबई, जळगाव जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशीम आणि नागपूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. 
Edited by - Priya Dixit   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात वारकरी संतांचा मेळा, ७ जून रोजी पालखी सोहळा

मुस्लिम पक्षाला शाही जामा मशीद सर्वेक्षण प्रकरणात मोठा धक्का, उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Covid-19 Alert: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लक्षणे काय आहेत? देशात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली

भारताच्या पुनर्जागरणात साईबाबांचे योगदान, शिर्डी मंदिराला भेट दिल्यानंतर संघ प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान

पुढील लेख
Show comments